शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: December 13, 2014 01:22 IST

भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

चंद्रपूर : भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या शाळेत सद्यस्थितीमध्ये एक ते आठपर्यंत वर्ग आहे. शाळेची पटसंख्या ११८ असून शिक्षक संख्या रेकॉर्डवर सहा आणि प्रत्यक्षात पाच अशी आहे. शासनाच्या नियमानुसार ११८ विद्यार्थ्यांना सहा शिक्षकांची गरज आहे. पण भटाळी शाळेत प्रत्यक्षात पाच शिक्षकच एक ते आठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम करीत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी येथील एक शिक्षिका निलंबित झाली आहे. त्यामुळे तिचे हजेरीपटावर नाव आहे. शासनाकडून तिला वेतनही मिळत आहे. परंतु ती जागा भरता येत नाही, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे, ही बाब मात्र जि.प. च्या लक्षात येत नाही. शिक्षकाची कमतरता लक्षात घेऊन मागील सत्रापासून शिक्षकाची मागणी करणारे पत्रसुध्दा दिले. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक देतो, असे तोंडी तात्पुरते आश्वासन देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना चूप केले. त्यानंतर शाळा समितीचे सदस्य सुभाष गौरकार यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सुद्धा समायोजनानंतर तुम्हाला एक शिक्षक देण्यात येईल, असे सांगून विषय तेथेच थांबविला. त्याचवेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढेही समस्या मांडण्यात आली. त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्हा परिषदेकडे भटाळी शाळेला एक शिक्षक देण्यात यावा, असे पत्र दिले. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात समायोजन झाले. निलंबित शिक्षिकेच्या जागेवर एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. शाळेत आदेश प्राप्त झाला. परंतु ते शाळेत रूजू झाले नाही. आणि हा प्रवास इथेच थांबून आहे. एकूणच या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक थांबलेले नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून यामध्ये आर.टी.एफ. च्या बट्याबोळ होत आहे. एकीकडे शासन प्राथमिक शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष पुरवून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करीत असल्याचा खोटा गवगवा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र खेडोपाडी शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विदारक चित्र आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक देत नाही, शिक्षक दिला तर त्यांना भारमुक्त करीत नाही. याला कोणते प्रशासन म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेवटी पर्याय उरला नाही नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक मिळाला नाही तर शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सुभाष गौरकार माजी पं.स. सदस्य यांनी दिला आहे. आता जि. प. प्रशासन गावकऱ्यांच्या या इशाऱ्याची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)