शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

चौकशीपूर्व अटकेच्या निषेधार्थ शिक्षण विभागातील अधिकारी सामूहिक रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:48 IST

शालार्थ आयडी प्रकरण : फायलींचा वाढला ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बोगस शालार्थ आयडीप्रकरणी नागपूर येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चौकशीपूर्व अटक केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्यभर सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. ८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसाद सोमवारी (दि. ११) ही उमटले, परिणामी, राज्यभरातील शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले. शासनस्तरावर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हास्तरावर शालेय कामकाजाच्या फायलींचा ढीग वाढत असून, या आंदोलनात राज्यभरातील चारशेहून अधिक अधिकारी सहभागी झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण विभागातील उपसंचालक आणि अन्य अधिकाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता थेट अटक केल्याने गट-अ अधिकाऱ्यांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना लिखित निवेदन देत, चौकशीपूर्व अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबईत शालेय शिक्षणमंत्री आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करणार असून, या चर्चेत तोडगा निघतो का याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

सामूहिक रजा आंदोलनामुळे कामकाजावर परिणामशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शालेय कामकाजावर होत आहे.शिक्षण अधिकारी अथवा वेतन पथक अधीक्षक वेतन बिलावर स्वाक्षरी करणार नसल्याचे संघटनेचे म्हटले आहे.

या आहे मागण्याकुठल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विनाचौकशी अटक करू नये, शालार्थबाबतची सर्व प्रकरणे शासन निर्णय ७ ऑगस्ट २०२५ द्वारे स्थापन एसआयटीकडे वर्ग करण्यात यावी, अपुरे मनुष्यबळ, भौतिक सुविधा तसेच सुटीच्या दिवशीचा अतिरिक्त कामाचा ताण यावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा.

टॅग्स :nagpurनागपूर