शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

रूतलेल्या उद्योगांचे अर्थचक्र होऊ लागले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर राजेश मडावी चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ...

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर

राजेश मडावी

चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन झाल्याने हजारो सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योगांचे अर्थचक्र थांबले. उत्पादन व विक्री, व्यवस्थापन या तीनही आघाड्यांवरील सर्व व्यवहार ठप्प झाला. लॉकडाऊन कालावधीतच संपूर्ण वर्षभराची अर्थव्यवस्था गारद झाली. लघु व सुक्ष्म उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, या वर्षाला गुडबाय करताना गाळात रूतलेले अर्थचक्र आता गतिमान होऊ लागले आहे. ही जिल्ह्यातील उद्योग जगतासाठी सुखद घटना असली तरी नव्या वर्षाचे स्वागत करताना संपूर्ण अर्थव्यवस्था रूळावर येईल, याची वाट उद्योजगत पाहत आहे.

वाढू लागली उत्पादीत मालाची मागणी

लॉकडाऊनआधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघूु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊन हटविल्यानंतर दोन महिन्यात २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये केवळ ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाला. कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यात प्रचंड अंतर होते. त्यामुळे उद्योगजगत हादरले. परंतु, या उद्योगांची चक्र आता सुरू झाले. उत्पादीत मालाची मागणी वाढली.

२७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला

कोरोनामुळे या वर्षात सुमारे २७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला. जिल्ह्यातील राईसमिल, चंद्रपूर औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, खते, सिमेंट, वाहने व विविध उद्योग क्षेत्रांनालागणारे सुटे भाग तयार करणाºया मध्यम कंपण्या, तेल गिरण्या, कृषी अवजारे, औष्णिक केंद्र व अन्य उद्योगांसाठी लागणारी तांत्रिक साधनांचे उत्पादन ठप्प झाले होते. सरत्या वर्षातील या सर्वात मोठ्या हाणीने २७ हजार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली.

पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

कोरोना विषाणुने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीवरच आघात केला. हातावर आणून पानावर खाणाºयांचे हाल झाले हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागली. या कालावधीत हजारो व्यक्तींनी स्वत:चे व्यवसाय बदलविले.

आठवडी बाजारांनी मिळाला आधार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्याने लहान दुकानदारांचे व्यवसाय बुडाले. बाजारांमुळे किती कोटींचा नुकसान झाला कळायला मार्ग नाही. प्रशासनानेही नुकसानीची नोंदणी केली नाही. मात्र, अनेकांना विक्रीयोग्य वस्तु घरीच ठेवून भाजीपाला विक्रीचे हंगामी व्यवसाय स्वीकारले. जुने वर्ष सरत असताना बाजार सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला.