शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

रूतलेल्या उद्योगांचे अर्थचक्र होऊ लागले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर राजेश मडावी चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ...

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर

राजेश मडावी

चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन झाल्याने हजारो सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योगांचे अर्थचक्र थांबले. उत्पादन व विक्री, व्यवस्थापन या तीनही आघाड्यांवरील सर्व व्यवहार ठप्प झाला. लॉकडाऊन कालावधीतच संपूर्ण वर्षभराची अर्थव्यवस्था गारद झाली. लघु व सुक्ष्म उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, या वर्षाला गुडबाय करताना गाळात रूतलेले अर्थचक्र आता गतिमान होऊ लागले आहे. ही जिल्ह्यातील उद्योग जगतासाठी सुखद घटना असली तरी नव्या वर्षाचे स्वागत करताना संपूर्ण अर्थव्यवस्था रूळावर येईल, याची वाट उद्योजगत पाहत आहे.

वाढू लागली उत्पादीत मालाची मागणी

लॉकडाऊनआधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघूु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊन हटविल्यानंतर दोन महिन्यात २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये केवळ ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाला. कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यात प्रचंड अंतर होते. त्यामुळे उद्योगजगत हादरले. परंतु, या उद्योगांची चक्र आता सुरू झाले. उत्पादीत मालाची मागणी वाढली.

२७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला

कोरोनामुळे या वर्षात सुमारे २७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला. जिल्ह्यातील राईसमिल, चंद्रपूर औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, खते, सिमेंट, वाहने व विविध उद्योग क्षेत्रांनालागणारे सुटे भाग तयार करणाºया मध्यम कंपण्या, तेल गिरण्या, कृषी अवजारे, औष्णिक केंद्र व अन्य उद्योगांसाठी लागणारी तांत्रिक साधनांचे उत्पादन ठप्प झाले होते. सरत्या वर्षातील या सर्वात मोठ्या हाणीने २७ हजार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली.

पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

कोरोना विषाणुने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीवरच आघात केला. हातावर आणून पानावर खाणाºयांचे हाल झाले हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागली. या कालावधीत हजारो व्यक्तींनी स्वत:चे व्यवसाय बदलविले.

आठवडी बाजारांनी मिळाला आधार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्याने लहान दुकानदारांचे व्यवसाय बुडाले. बाजारांमुळे किती कोटींचा नुकसान झाला कळायला मार्ग नाही. प्रशासनानेही नुकसानीची नोंदणी केली नाही. मात्र, अनेकांना विक्रीयोग्य वस्तु घरीच ठेवून भाजीपाला विक्रीचे हंगामी व्यवसाय स्वीकारले. जुने वर्ष सरत असताना बाजार सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला.