शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

रूतलेल्या उद्योगांचे अर्थचक्र होऊ लागले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर राजेश मडावी चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ...

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर

राजेश मडावी

चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन झाल्याने हजारो सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योगांचे अर्थचक्र थांबले. उत्पादन व विक्री, व्यवस्थापन या तीनही आघाड्यांवरील सर्व व्यवहार ठप्प झाला. लॉकडाऊन कालावधीतच संपूर्ण वर्षभराची अर्थव्यवस्था गारद झाली. लघु व सुक्ष्म उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, या वर्षाला गुडबाय करताना गाळात रूतलेले अर्थचक्र आता गतिमान होऊ लागले आहे. ही जिल्ह्यातील उद्योग जगतासाठी सुखद घटना असली तरी नव्या वर्षाचे स्वागत करताना संपूर्ण अर्थव्यवस्था रूळावर येईल, याची वाट उद्योजगत पाहत आहे.

वाढू लागली उत्पादीत मालाची मागणी

लॉकडाऊनआधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघूु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊन हटविल्यानंतर दोन महिन्यात २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये केवळ ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाला. कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यात प्रचंड अंतर होते. त्यामुळे उद्योगजगत हादरले. परंतु, या उद्योगांची चक्र आता सुरू झाले. उत्पादीत मालाची मागणी वाढली.

२७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला

कोरोनामुळे या वर्षात सुमारे २७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला. जिल्ह्यातील राईसमिल, चंद्रपूर औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, खते, सिमेंट, वाहने व विविध उद्योग क्षेत्रांनालागणारे सुटे भाग तयार करणाºया मध्यम कंपण्या, तेल गिरण्या, कृषी अवजारे, औष्णिक केंद्र व अन्य उद्योगांसाठी लागणारी तांत्रिक साधनांचे उत्पादन ठप्प झाले होते. सरत्या वर्षातील या सर्वात मोठ्या हाणीने २७ हजार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली.

पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

कोरोना विषाणुने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीवरच आघात केला. हातावर आणून पानावर खाणाºयांचे हाल झाले हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागली. या कालावधीत हजारो व्यक्तींनी स्वत:चे व्यवसाय बदलविले.

आठवडी बाजारांनी मिळाला आधार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्याने लहान दुकानदारांचे व्यवसाय बुडाले. बाजारांमुळे किती कोटींचा नुकसान झाला कळायला मार्ग नाही. प्रशासनानेही नुकसानीची नोंदणी केली नाही. मात्र, अनेकांना विक्रीयोग्य वस्तु घरीच ठेवून भाजीपाला विक्रीचे हंगामी व्यवसाय स्वीकारले. जुने वर्ष सरत असताना बाजार सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला.