शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रूतलेल्या उद्योगांचे अर्थचक्र होऊ लागले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर राजेश मडावी चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ...

अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर

राजेश मडावी

चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन झाल्याने हजारो सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योगांचे अर्थचक्र थांबले. उत्पादन व विक्री, व्यवस्थापन या तीनही आघाड्यांवरील सर्व व्यवहार ठप्प झाला. लॉकडाऊन कालावधीतच संपूर्ण वर्षभराची अर्थव्यवस्था गारद झाली. लघु व सुक्ष्म उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, या वर्षाला गुडबाय करताना गाळात रूतलेले अर्थचक्र आता गतिमान होऊ लागले आहे. ही जिल्ह्यातील उद्योग जगतासाठी सुखद घटना असली तरी नव्या वर्षाचे स्वागत करताना संपूर्ण अर्थव्यवस्था रूळावर येईल, याची वाट उद्योजगत पाहत आहे.

वाढू लागली उत्पादीत मालाची मागणी

लॉकडाऊनआधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघूु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊन हटविल्यानंतर दोन महिन्यात २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये केवळ ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाला. कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यात प्रचंड अंतर होते. त्यामुळे उद्योगजगत हादरले. परंतु, या उद्योगांची चक्र आता सुरू झाले. उत्पादीत मालाची मागणी वाढली.

२७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला

कोरोनामुळे या वर्षात सुमारे २७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला. जिल्ह्यातील राईसमिल, चंद्रपूर औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, खते, सिमेंट, वाहने व विविध उद्योग क्षेत्रांनालागणारे सुटे भाग तयार करणाºया मध्यम कंपण्या, तेल गिरण्या, कृषी अवजारे, औष्णिक केंद्र व अन्य उद्योगांसाठी लागणारी तांत्रिक साधनांचे उत्पादन ठप्प झाले होते. सरत्या वर्षातील या सर्वात मोठ्या हाणीने २७ हजार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली.

पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय

कोरोना विषाणुने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीवरच आघात केला. हातावर आणून पानावर खाणाºयांचे हाल झाले हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागली. या कालावधीत हजारो व्यक्तींनी स्वत:चे व्यवसाय बदलविले.

आठवडी बाजारांनी मिळाला आधार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्याने लहान दुकानदारांचे व्यवसाय बुडाले. बाजारांमुळे किती कोटींचा नुकसान झाला कळायला मार्ग नाही. प्रशासनानेही नुकसानीची नोंदणी केली नाही. मात्र, अनेकांना विक्रीयोग्य वस्तु घरीच ठेवून भाजीपाला विक्रीचे हंगामी व्यवसाय स्वीकारले. जुने वर्ष सरत असताना बाजार सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला.