शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

७०० सुक्ष्म, लघू उद्योगांचे अर्थचक्र अजूनही रूतलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 9:32 PM

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिर्वाहाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचे आजही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटीत क्षेत्रातील हजारो कामगारांना बसला होता. रूळावरून घसरलेले अर्थचक्र लवकरच मार्गी लागेल अशी आशा होती. मात्र, दिवाळी तोंडावर असतानाही मंदावलेल्या मागणीमुळे, सुक्ष्म, लघु व बिगर कृषी क्षेत्रातील सुमारे ७०० लघु उद्योग अद्याप सावरलेच नाहीत. पुरेसा रोजगारच मिळत नसल्याने कामगारांनाही उद्याची चिंता सतावू लागली आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिर्वाहाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचे आजही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंसह बरेच व्यवसाय सुरू झाले. मात्र, प्रामुख्याने रोजगार पुरविणाऱ्या सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग व कृषिपूरक तसेच बिगरकृषी सहकारी संस्थांची स्थिती अजुनही पालटली नाही.कोरोना लॉकडाऊन उठविल्यानंतर बदललेली कामगारांची संख्या, स्वबळावर उद्योग चालविणारे व्यक्ती, कृषी व बिगर संस्थांमध्ये कामगारांची माहिती संकलनाचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. हा डेटा सुद्धा चिंतेत भरणारी असल्याची माहिती प्रशासकीय वर्तुळातील सूत्राने ह्यलोकमतह्णला दिली.सुरू झालेले उद्योगही संकटातलॉकडाऊन आधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता.लॉकडाऊन हटविल्यानंतर २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता.परंतु, कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यातील अंतर दूर झाले नाही. त्यामुळे कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कमी करणे सुरू झाले आहे.म्हणे फक्त १४ हजार बेरोजगार!जिल्ह्यातील राईसमील, चंद्रपूर औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, सिमेंट, वाहने व विविध उद्योगांना लागणारे सुटे भाग, तेल गिरण्या, कृषी क्षेत्रातील निगडीत अवजारे व औष्णिक केंद्रासाठी आवश्यक तांत्रिक साधनांचे उत्पादन सुरू आहे. मात्र, मागणीअभावी या उद्योगांनीही कामगार कमी केले. उद्योग विभागाच्या माहितीनुसार १४ हजार व्यक्ती बेरोजगार झाल्याची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या धक्कादायक असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या