वैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठची शेती झाली वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:29+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव शिवारातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे.

वैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठची शेती झाली वाळवंट
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आल्याने वैनगंगा नदीकाठावरील निलज, पिंपळगाव, खरकाड परिसरातील शेतीला रेतीमुळे वाळवंटाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे काही वर्ष पिकच घेता येणार नाही, या प्रश्नाने शेतकरी भीती व्यक्त केली जात आहे.
पुरामुळेशेतकऱ्यांची शेतातील मोटरपंप, पाईप, वीज मीटर वाहुन गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आली होती. नदीकाठावर असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव शिवारातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे या सर्व पूरग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मत्स्य व्यावसायिकांचे नाव गेले वाहून
वैनगंगा नदीमध्ये ढिवर समाज बांधव अनेक वर्षांपासून मासेमारी करून प्रपंच चालवतात. महापुरामूळे मासेमारी करणाºया अनेकांचे नाव वाहून केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करताना पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी निलज येथील भारत मांढरे आदींसह अनेकांनी केली आहे.