शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांमुळे शेती झाली समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 01:22 IST

भारत देश कृषी प्रधान देश असल्याने जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात वास्तव्य करतात.

तालुक्यात २०३ शेततळे : यंदाच्या खरिपात सिंचनासाठी लाभ होणार राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल: भारत देश कृषी प्रधान देश असल्याने जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात वास्तव्य करतात. त्याचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचनाची सोय आवश्यक आहे. हे हेरुन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात आली. त्यात मूल तालुक्यात शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत २०३ शेततळे तयार केले आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या शेततळ्यामुळे शेती समृद्ध झाल्याचे दिसून येते. शासनाच्या शेतीविषयक योजनांचा फायदा घेतला तर शेती विकासाला चालना मिळते, हे स्पष्ट दिसून येते. दिवसेंदिवस पाण्याचा लहरीपणा शेती उत्पादनाला घातक ठरु पाहत असताना मात्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून विविध सिंचनाच्या योजना अंमलात आणत आहे. याचाच एक भाग म्हणून मागील फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना आणण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार याचे क्षेत्र असलेल्या मूल तालुक्याला वेगळे महत्व आहे. तालुक्यातील शेतकरी सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध व्हावा, हीदेखील त्यांची मनिषा असल्याने येथील तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांनी नियोजनबद्ध आखणी करुन आपल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले. कुठलीही हयगय होणार नाही, याची काळजी घेत मागेल त्याला शेततळे ही योजना यशस्वी करण्याचा ध्यास घेतला. २८३ आलेल्या इच्छुक लाभार्थीपैकी अर्जाची छाननी करुन तालुकास्तरीय समितीने २०३ लाभार्थीना शेततळे तयार करण्यासाठी मंजुरी प्रदान केली. यावेळी विविध शासकीय कार्यालयाची कामे असल्याने पोकलँड किंवा जेसीबी हे यंत्र उपलब्ध होणे शेतकऱ्यांना कठीण झाले होते. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करुन १२५ शेततळे लाभाथीर् शेतकऱ्यांनी यंत्राविना खोदकाम करुन पूर्ण केले व उर्वरित शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे शेततळ्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे मागील वर्षात २०३ शेततळे झाल्याने सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकली. खंडीत पावसाच्या वेळेस लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळ्यातील पाण्यापासून आपले धान्य पीक सुरक्षित करण्यास मदत झाली. त्यापासून ४० हेक्टर संरक्षित क्षेत्रात पाणीसाठा पुरविण्यात आला. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे दोनदा शेततळ्यामधील पाणीसाठा उपलब्ध होऊन शेतीसाठी मदत झाली. तसेच सदर पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील हरभरा, गहू, सांबार, वाल, पोपट व इतर कडधान्य व भाजीपाल्याच्या पिक उत्पादनात झाला आहे. शेततळ्यातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी बांधावर कमी उंचीचे झाडे लावली असल्याने पर्यावरणाचा समतोलदेखील कायम राखला जात आहे.