‘त्या’ मायलेकींच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

By Admin | Updated: May 30, 2015 01:38 IST2015-05-30T01:38:08+5:302015-05-30T01:38:08+5:30

मुुलीच्या सासरी भेट घेण्यासाठी आलेली मुलीची आई पुष्पा चित्तलवार (५०) आणि मुलगी लक्ष्मी येमुलवार (२८) या दोघीही भिवापूर येथील ...

'That' due to the death of mylike, in the bouquet | ‘त्या’ मायलेकींच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

‘त्या’ मायलेकींच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

विषबाधा प्रकरण : घटनास्थळावर आढळले सरबताचे तीन ग्लास
बाबुपेठ (चंद्रपूर) : मुुलीच्या सासरी भेट घेण्यासाठी आलेली मुलीची आई पुष्पा चित्तलवार (५०) आणि मुलगी लक्ष्मी येमुलवार (२८) या दोघीही भिवापूर येथील लक्ष्मीच्या राहते घरी बुधावारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता दोघींचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून घटनास्थळवरुन मिळालेल्या सरबतच्या तीन ग्लॉसमुळे हे तिसरे ग्लास कुणाचे, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, याचे गूढ अद्यापही कायमच आहे.
मायलेकींचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. मात्र पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. ग्लॉसमधील शरबताचे नमुने तपासणीकरिीाा नागपूर लॅबमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लालपेठ रहिवासी पुष्पा बुधवारी आपल्या मुलीच्या भेटीकरिता तिच्या भिवापूर येथील घरी आली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास मुलगी आणि आई दोघांनाही विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावर सरबतचे तीन ग्लास मिळाले. त्यातील दोन ग्लास खाली तर एक ग्लास सरबतने भरलेला होता. त्यासोबतच सरबत बनविण्यात आलेला गंजही पोलिसांनी ताब्यात घेतला असून सरबताचे नमुने तपासणीकरिता नागपूरला पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालही अद्याप अप्राप्त असल्याने दोन्ही अहवाल आल्यावर घटनेचा उलगडा होणार आहे.
घटनास्थळावर मिळालेला तिसरा ग्लास कुणाचा होता आणि तो शरबत न पिताच निघून का गेला असावा, या प्रश्नाचे उत्तरही शोधण्यात पोलीस प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'That' due to the death of mylike, in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.