शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

कागदी, प्लास्टिक कपमध्ये चहा, कॉफी पिल्यास कर्करोगाचा धोका ! कपांवर केव्हा येणार बंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:58 IST

तज्ज्ञांनी व्यक्त केला धोका : चायप्रेमींनो सावध व्हा !

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चहाच्या टपरीवर पेपर अथवा प्लास्टिकच्या कपमधून चहा दिला जातो. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे अशा कपमध्ये चहा पिणे टाळावे, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप वरघने यांनी दिला आहे.

राज्यातील सिंगल यूज प्लास्टिकच्या काही वस्तूंवर सध्या बंदी आहे. नवीन नियमानुसार १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांनादेखील वापरास बंदी आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ अनुसार सिंगल यूज (एकल वापर) प्लास्टिकच्या काही वस्तूंना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. भाजी, फळ आणि किराणा मालाचे विक्रेते यांच्याकडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यामध्ये साहित्य दिले जात आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

चाय हा सर्वांच्या आवडीचे पेय. थकवा दूर करण्याच्या अनुषंगाने अनेकजण वेळी-अवेळी टपरीवर हॉटेलात चाप पितात. मात्र चायटपरी, हॉटेलमध्ये कागदी व प्लास्टिकच्या कपचा वापर केला जात असल्याचे बरेच ठिकाणी बघायला मिळते. मात्र अशा कपचा वापर करणे धोकादायक आहे. 

दंडाची रक्कम मोठी, तरीही दुर्लक्ष...बंदी असलेल्या प्लास्टिकचा पहिल्यांदा वापर करताना आढळल्यास दुकानदाराकडून पाच हजार रुपये इतका दंड आकारला जात आहे. दुसऱ्यांदा २० हजार तर तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये इतका दंड वसूल केला जात आहे. दंड करूनही प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

शहरात महापालिकेची कारवाई थंडावली...महापालिकेची प्लास्टिक पिशव्यांबाबतची कारवाई सध्या थंडावली आहे. ही कारवाई करण्यासाठी ८ क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र पथके तैनात केली आहे. प्रत्येक पथकामध्ये १ सहायक आरोग्याधिकारी, १ मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आदी पथकांचा समावेश आहे.

४ पथकेप्लास्टिक पिशव्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मनपाने चार पथके गठित केले आहे. ते कारवाईसाठी गस्त घालतात.

बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदीमागील काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक कप हे आरोग्यास धोकादायक असल्याचे संशोधनातून पुढे आले होते. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक कपवर बंदी घातली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक व कागदी कप बंदीचे काढलेले पत्र हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

"कागदापासून बनवलेले कप सुरक्षित ठेवण्यासाठी कार्बडिझम कीटकनाशक-बुरशीनाशक वापरले जाते. गरम चहा, कॉफी आदी कपमध्ये टाकल्यावर त्यात रसायने विरघळून पेयांसह शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो."- डॉ. प्रदीप वरघने, जनरल फिजिशियन

टॅग्स :Healthआरोग्यPlastic banप्लॅस्टिक बंदीchandrapur-acचंद्रपूर