शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कागदी, प्लास्टिक कपमध्ये चहा, कॉफी पिल्यास कर्करोगाचा धोका ! कपांवर केव्हा येणार बंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:58 IST

तज्ज्ञांनी व्यक्त केला धोका : चायप्रेमींनो सावध व्हा !

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चहाच्या टपरीवर पेपर अथवा प्लास्टिकच्या कपमधून चहा दिला जातो. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे अशा कपमध्ये चहा पिणे टाळावे, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप वरघने यांनी दिला आहे.

राज्यातील सिंगल यूज प्लास्टिकच्या काही वस्तूंवर सध्या बंदी आहे. नवीन नियमानुसार १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांनादेखील वापरास बंदी आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ अनुसार सिंगल यूज (एकल वापर) प्लास्टिकच्या काही वस्तूंना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. भाजी, फळ आणि किराणा मालाचे विक्रेते यांच्याकडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यामध्ये साहित्य दिले जात आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

चाय हा सर्वांच्या आवडीचे पेय. थकवा दूर करण्याच्या अनुषंगाने अनेकजण वेळी-अवेळी टपरीवर हॉटेलात चाप पितात. मात्र चायटपरी, हॉटेलमध्ये कागदी व प्लास्टिकच्या कपचा वापर केला जात असल्याचे बरेच ठिकाणी बघायला मिळते. मात्र अशा कपचा वापर करणे धोकादायक आहे. 

दंडाची रक्कम मोठी, तरीही दुर्लक्ष...बंदी असलेल्या प्लास्टिकचा पहिल्यांदा वापर करताना आढळल्यास दुकानदाराकडून पाच हजार रुपये इतका दंड आकारला जात आहे. दुसऱ्यांदा २० हजार तर तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये इतका दंड वसूल केला जात आहे. दंड करूनही प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

शहरात महापालिकेची कारवाई थंडावली...महापालिकेची प्लास्टिक पिशव्यांबाबतची कारवाई सध्या थंडावली आहे. ही कारवाई करण्यासाठी ८ क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र पथके तैनात केली आहे. प्रत्येक पथकामध्ये १ सहायक आरोग्याधिकारी, १ मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आदी पथकांचा समावेश आहे.

४ पथकेप्लास्टिक पिशव्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मनपाने चार पथके गठित केले आहे. ते कारवाईसाठी गस्त घालतात.

बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदीमागील काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक कप हे आरोग्यास धोकादायक असल्याचे संशोधनातून पुढे आले होते. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक कपवर बंदी घातली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक व कागदी कप बंदीचे काढलेले पत्र हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

"कागदापासून बनवलेले कप सुरक्षित ठेवण्यासाठी कार्बडिझम कीटकनाशक-बुरशीनाशक वापरले जाते. गरम चहा, कॉफी आदी कपमध्ये टाकल्यावर त्यात रसायने विरघळून पेयांसह शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो."- डॉ. प्रदीप वरघने, जनरल फिजिशियन

टॅग्स :Healthआरोग्यPlastic banप्लॅस्टिक बंदीchandrapur-acचंद्रपूर