कचराळ्याच्या बंद घाटातून रेतीचा उपसा

By Admin | Updated: December 20, 2014 00:56 IST2014-12-20T00:56:49+5:302014-12-20T00:56:49+5:30

पर्यावरण आणि वन्यप्राण्यांना बाधा पोहचू नये म्हणून वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कचराळा गावालगतच्या जंगलातील

Drainage of the sand from the closed waste of the waste | कचराळ्याच्या बंद घाटातून रेतीचा उपसा

कचराळ्याच्या बंद घाटातून रेतीचा उपसा

विनायक येसेकर भद्रावती
पर्यावरण आणि वन्यप्राण्यांना बाधा पोहचू नये म्हणून वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कचराळा गावालगतच्या जंगलातील कचराळा नाल्यातील रेती उपशावर बंद घातली. याचा लिलाव होत नाही. मात्र रेती तस्कर गेल्या कित्येक दिवसांपासून या घाटातून रेतीचा उपसा करीत आहे. याबाबत वनविभाग, महसूल, पोलीस यांना सुचनासुद्धा केल्या आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. लोकमतने गुरुवारी या घाटाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा झाल्याचे दिसून आले.
३० सप्टेंबरनंतर रेती घाटांवरील रेती उपसा करण्याची मुदत संपल्याने रेती तस्करांनी या नाल्याकडे नजर टाकली आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात रेती असल्याने त्या ठिकाणावरून ट्रॅक्टरसह मोठ्या मालवाहू गाड्यांनी रेतीचे वहन केले जात आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून रात्रीच्या उपसा आणि वहनामुळे वन्यप्राण्यांना याचा त्रास होत आहे. यामुळे त्यांनीही आपला मोर्चा कचराळा आणि तिरवंजा या जंगल शेजारी असलेल्या गावाकडे वळविला आहे. काही दिवसापूर्वी तिरवंजा येथील एका वृद्धावर त्याचेच शेतात बिबट्याने हल्ला केला होता. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री जागली करीत नसल्याने रानडुक्कर उभे पीक उद्धवस्त करीत आहे. कचराळा हे गाव नाल्याला लागून असल्याने रात्रभर चालणाऱ्या ट्रॅक्टर व गाड्यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली आहे. याबाबत येथील काही नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अवैध रेती उत्खनाबाबत तहसीलदार सचिन कुमावत यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. परंतु हे काम पोलिसांचे असल्याचे सांगून त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. याची चौकशी करणे गरजेचे आहे.
उच्च न्यायालयाच्या एका आदेशान्वये रात्री केली जात असलेली गौण खनिजाची चोरी पकडण्याचे काम हे पोलिसांचे असल्याचे सांगितले आहे.दिवसा होत असलेली चोरी महसूल विभागाचे कर्मचारी पकडत असतात. कचराळा येथील कुण्याही नागरिकाने आपल्याला भेटून या चोरी संदर्भात माहिती दिली नाही.
- सचिन कुमावत, तहसीलदार, भद्रावती
कम्पाऊंडही उद्ध्वस्त
महाऔष्णिक वीज केंद्राने रानडुकरांपासून सभोवतालच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करण्यासाठी सौर उर्जेवरील विद्युत तारेच कम्पाऊंड तयार केले आहे. प्रवेशद्वारसुद्धा आहे. मात्र रेती तस्करांनी ते उद्ध्वस्त केले आहेत. गावपातळीवरील शासकीय हुद्यावर व समितीवर नेमून दिलेले पदाधिकारचीच आपल्या मालकीच्या टॅक्टरद्वारे रेतीचा अवैध उपसा करीत असल्याची माहिती आहे.

Web Title: Drainage of the sand from the closed waste of the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.