शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाणी पिताय ना, मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:34 IST

दूषित पाण्यापासून सुमारे पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यामध्ये गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, ...

दूषित पाण्यापासून सुमारे पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यामध्ये गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रुग्णाला दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने अखेर रुग्णाला सलाइन लावण्याची वेळ येते. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या उलटी व जुलाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत.

बॉक्स

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर एक ते दोन दिवसांत खूप जुलाब सुरू होतात. पोटात खूप दुखते. कळा येतात. तीन ते चार दिवसांत प्रकर्षाने ताप येतो. त्यामुळे अनेकदा ॲन्टीबायोटिक्स देऊन रुग्णाला बरे केले जाते.

बॉक्स

आजाराची लक्षणे

दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणे ही लक्षणे दिसतात. त्याशिवाय चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यात हा आजाराची लक्षणे कायम राहतात. ९० ते ९५ टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

बॉक्स

आजार टाळण्यासाठी काय करावे

पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पाणी उकळून प्यावे. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळते. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाणं टाळावे. पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या व जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ- साखर-पाणी सतत पित राहावे. त्यामुळे शरीराला आराम मिळू शकतो.

कोट

मेडिकल स्टोअर्समध्ये ओआरएस पावडर मिळते. ती एक लीटर पाण्यात टाकून प्यावी. टेट्रा पॅक्सदेखील उपलब्ध आहेत ते प्यावे. नारळाचे पाणी घ्यावे. मात्र, ग्लुकॉन डी अथवा कोल्ड्रिंक्स घेणे या दिवसात टाळावे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करावी.

-डॉ. व्ही. एस. नगराळे, आजारतज्ज्ञ, चंद्रपूर.