कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:54+5:302021-07-17T04:22:54+5:30
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. सद्यस्थितीत बससेवा तसेच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. ...

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून सार्वजनिक
वाहतूक विस्कळीत झाली आहे. सद्यस्थितीत बससेवा तसेच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र पॅसेंजर गाड्यांना अद्यापही हिरवी झेंडी दाखविण्यात आली नाही. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: अतिरिक्त पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.
इतर वाहतुकीप्रमाणे पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, सध्या सर्वच व्यवहार सुरळीत सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बहुतांश एक्स्प्रेस रेल्वेगाड्या धावत आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुसरीकडे मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, यामुळे पॅसेंजर रेल्वे बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेनेच कोरोना पसरतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशा रेल्वे स्टेशनमध्ये बहुतांश रेल्वे थांबतात; मात्र कोरोना काळापासून केवळ विशेष ट्रेनच थांबत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
बाॅक्स
मग पॅसेंजर बंद का?
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाच्या नियमानुसार काही स्पेशल ट्रेन चालविल्या जात आहेत. मात्र या रेल्वेमध्ये आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यातून कोरोना पसरत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पॅसेंजरही सुरू करण्याची गरज आहे.
बाॅक्स
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
नवजीवन
संघमित्रा
दक्षिण
जीटी
तामिलनाडू
तेलंगना
बंगलोर-निजामुद्दीन
दानापूर-सिकंदराबाद
केरला
विशाखापट्टणम्- नवी दिल्ली
यशवंतपूर-निजामुद्दीन
बाॅक्स
एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही
कोरोनामुळे ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशन ओस पडली आहेत. एकही रेल्वे थांबत नसल्यामुळे प्रवास कसा करावा, हा प्रश्न आहे. अन्य वाहनांने अतिरिक्त पैसे मोजावे लागत असून, वेळही वाया जात आहे.
सतीश चहारे, चंद्रपूर
कोट
पॅसेंजर सुरू नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतर सार्वजिनक वाहतुकीप्रमाणे रेल्वे पॅसेंजर सुरू करायला पाहिजेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तसेच पैशाची बचत होईल. पॅसेंजरमधून कोरोना होतो, मग एक्स्प्रेसमधून होत नाही का?
अनुप खुटेमाटे,
भद्रावती
कोट
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप कोणत्याहीप्रकारचे आदेश नाहीत. अधिकृत सूचना आल्यानंतरच या पॅसेंजर सुरू होईल.
- रामलाल सिंग,
स्टेशन मास्तर, बल्लारपूर