शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

वितरण व्यवस्थेत आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ग्राहकांच्या मूलभूत हक्काचे होणार सवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्राहकाला घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मूलभूत अधिकार आणि हक्काचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती करीत आहे. ग्राहकाने आपल्या मुलभुत हक्काप्रति नेहमी जागरुक राहावे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य गिरीधरसिंह बैस, वामनराव नामपल्लीवार, सदाशिव सुकारे तथा धान्य सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य उपस्थित होते.शासकीय कार्यालयीन अधिकारी नागरिकांना, अभ्यांगताना भेटत नाहीत. प्रश्न गांभीर्याने समजून घेत नाहीत. मराठी भाषेचा वापर होत नसून संवादात इंग्रजी शब्दाचा उच्चार करण्यात येऊ नये. अभ्यांगताकरिता राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सूचना फलकावर ठळक पणे प्रदर्शित करावे, अशा मागणी यावेळी केली.तक्रार केल्यास ७२ तासांत कार्यवाहीराज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी. ही तक्रार नोंदविल्यानंतर ७२ तासांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही केल्या जात असल्याचे सांगून ते म्हणाले की चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास रोखले असता ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार त्यांनी यावेळी केले.जनतेच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवावा१८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय अन्वये शासकीय कार्यालयात जनतेच्या भेटीसाठी दुपारी २.३० ते ३.३० ही वेळ राखून ठेवावी व उपविभाग स्तरावर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ कालावधी, तालुका स्तरावर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते ५ हा कालावधी अभ्यांगतासाठी राखून ठेवावा, असे ठरले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. याशिवाय अभ्यांगतासाठी राखून ठेवालेल्या कालावधीत अधिकाऱ्यांनी शक्यतो दौरा, बैठक आयोजित करु नये, अशी मागणीही सदस्यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी