शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

खाण कामगारांच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा

By admin | Updated: December 17, 2015 01:08 IST

भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची कोळसा कंपनी व शासनाकडून फसवणूक झाल्याने त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी....

आठ किमीच्या आत होणार गावाचे पुनर्वसन : ४६४ कामगारांना करणार पूर्ववतभद्रावती : भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची कोळसा कंपनी व शासनाकडून फसवणूक झाल्याने त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर यांनी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला. त्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी सभागृहात आ. बाळू धानोरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. विधानसभेमध्ये लागलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक ३ नुसार आ. बाळू धानोरकर यांनी बरांज येथील १ एप्रिल २०१५ पासून बंद असलेल्या व केपीसीएलला आवंटीत झालेल्या खाणीचा, प्रकल्पग्रस्तांचा व कामगारांच्या नोकरीचा विषय मांडला असता, महाराष्ट्र शासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुडरारा या गावी न करता ८ कि.मी. च्या आत करण्याचे मान्य केले. तसेच ४६४ कामगारांना उर्वरीत ७ महिन्याचे वेतन देण्याचे देखील मान्य केले. त्याचप्रमाणे एकुण ४६४ कामगारांना कामावरून कमी न करता पुर्ववत कामावर ठेवण्याचे देखील कबुल केले.९ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासन व कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडमध्ये झालेला करारनामा रद्द करावा व कोल इंडियाची सन २०१२ ची पॉलीसी लागू करावी, अशी मागणी केली असता पुनर्वसन करारनामा तपासून त्याविषयी योग्य निर्णय घेऊ, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कामडे यांनी आश्वासन दिले. या सर्व बाबीवरून ११ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाचा केपीसीएलसोबत झालेला पुनर्वसनाचा करारनामा रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसुन येते.तत्पुर्वी दुपारी १२ वाजता आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात सभागृहापुढे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. विविध घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. आंदोलनाचे वेळी आ. डॉ. राहुल पाटील, आ. हर्षवर्धन जाधव, आ.योगेश घोलप, आ. किशोर आप्पा पाटील, आ. सुभाष भोईर, आ. मंगेश कुडाळकर, आ. साळवी, आ. सुर्वे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)