शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

खाण कामगारांच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा

By admin | Updated: December 17, 2015 01:08 IST

भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची कोळसा कंपनी व शासनाकडून फसवणूक झाल्याने त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी....

आठ किमीच्या आत होणार गावाचे पुनर्वसन : ४६४ कामगारांना करणार पूर्ववतभद्रावती : भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची कोळसा कंपनी व शासनाकडून फसवणूक झाल्याने त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर यांनी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला. त्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी सभागृहात आ. बाळू धानोरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. विधानसभेमध्ये लागलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक ३ नुसार आ. बाळू धानोरकर यांनी बरांज येथील १ एप्रिल २०१५ पासून बंद असलेल्या व केपीसीएलला आवंटीत झालेल्या खाणीचा, प्रकल्पग्रस्तांचा व कामगारांच्या नोकरीचा विषय मांडला असता, महाराष्ट्र शासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुडरारा या गावी न करता ८ कि.मी. च्या आत करण्याचे मान्य केले. तसेच ४६४ कामगारांना उर्वरीत ७ महिन्याचे वेतन देण्याचे देखील मान्य केले. त्याचप्रमाणे एकुण ४६४ कामगारांना कामावरून कमी न करता पुर्ववत कामावर ठेवण्याचे देखील कबुल केले.९ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासन व कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडमध्ये झालेला करारनामा रद्द करावा व कोल इंडियाची सन २०१२ ची पॉलीसी लागू करावी, अशी मागणी केली असता पुनर्वसन करारनामा तपासून त्याविषयी योग्य निर्णय घेऊ, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कामडे यांनी आश्वासन दिले. या सर्व बाबीवरून ११ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाचा केपीसीएलसोबत झालेला पुनर्वसनाचा करारनामा रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसुन येते.तत्पुर्वी दुपारी १२ वाजता आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात सभागृहापुढे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. विविध घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. आंदोलनाचे वेळी आ. डॉ. राहुल पाटील, आ. हर्षवर्धन जाधव, आ.योगेश घोलप, आ. किशोर आप्पा पाटील, आ. सुभाष भोईर, आ. मंगेश कुडाळकर, आ. साळवी, आ. सुर्वे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)