औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी अडचणीत
By Admin | Updated: November 18, 2015 01:07 IST2015-11-18T01:07:35+5:302015-11-18T01:07:35+5:30
नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्यानंतरही गुणपत्रिका न आल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी अडचणीत
शंकरपूर : नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्यानंतरही गुणपत्रिका न आल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजतंत्री व जोडारी ट्रेड आहे. हे दोन वर्षाचे कोर्स आहे, या दोनही ट्रेडसाठी सेमिस्टर पॅटर्न परिक्षा आहे. या दोनही कोर्ससाठी ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला सत्र २०१३-१५ मध्ये चारही सेमिस्टरच्या परिक्षा झाल्यात पहिले, दुसरे व चौथ्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्यात परंतु तिसऱ्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका अद्यापही प्राप्त झाल्या नाही. तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा फेब्रुवारी २०१५ मध्ये परीक्षा झाल्यात आठ महिन्याचा कालावधी होवूनही गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला समोर जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर बिटीआरआय कार्यालयात नोंद करावी लागते ते नोंदही विद्यार्थी करू शकले नाही. त्यामुळे तेथून नौकरी संदर्भात मुलाखत पत्रही विद्यार्थ्यांना मिळाले नाही. या सोबतच कंपनी अथवा इतर ठिकाणी विद्यार्थी नौकरीसाठी अर्ज करु शकत नाही. या संदर्भात वारंवार प्राचार्य, शिक्षक या संबंधीत कार्यालय कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. शिष्यवृत्ती संदर्भातही घोळ असून अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. दोनही वर्षाची शिष्यवृत्ती अर्ज वेळेत विद्यार्थ्यांनी सादर केली. पहिल्या वर्षीची अर्धीच शिष्यवृत्ती प्राप्त झाली तर दुसऱ्या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत प्राप्त झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)