शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

कुसंगाने विनाशच साधेल

By admin | Updated: January 12, 2016 00:57 IST

सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, ...

स्वामी गोविंददेव महाराज : श्रीरामकथा प्रवचनमालेचे पाचवे आख्यानचंद्रपूर : सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, कारण त्याचा शेवट पतनातच होणार असल्याचा हितोपदेश आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सोमवारी केला. येथील चित्रकुट धाममध्ये चाललेल्या श्रीरामकथा मालेत पाचवे पुष्प गुंफताना स्वामीजींनी कैकयी-मंथरा प्रसंगाचे निरुपण केले. कलंकाची ज्याला काळजी असते, तोच मुळात संवेदनशील असतो. त्याचेच अंत:करण शुध्द असते. राम वनवासाचा संदर्भ देत ते म्हणाले, त्यागाला कठीण परीक्षेतून जावे लागते. आज राष्ट्र-धर्म परंपरा वाचवायलासुध्दा त्यागाचीच गरज असल्याची गरज आचार्य स्वामीजींनी प्रतिपादित केली. कथेतील पाचव्या दिवसाचे मुख्य यजमान लीलाराम उपाध्याय, राजमान सुधाकर चकनलवार, नरसिंगदास सारडा यांनी ग्रंथाची आरती केली. नागपूरहून आलेल्या अशोक करवा, गडचिरोलीचे माधोलाल शर्मा, डॉ. सुशील मुंधडा, कृषी अधिकारी देशमुख, डॉ. कुबेर कोतपल्लीवार, डॉ. विलास झुल्लरवार, कोल डिलर्स असोशिएशनचे सुरेश अग्रवाल, माहेश्वरी युवक मंडळाचे सुरेश राठी, अजय मेहता, महावीर मंत्री, रामकथा ज्ञानयज्ञ समितीच्यावतीने रोडमल गहलोत, विदर्भ माहेश्वरी सभेचे रामेश्वरलाल काबरा यांनी स्वामीजींचे विशेष आशीर्वचन घेतले. मुलांनी वेधले लक्षगिता परिवाराच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या शाळेतील २१ बालकांनी सोमवारी श्रीराम कथामालेच्या व्यासपीठावर गिता वाचन केले. त्यामुळे वातावरणात भक्ती-श्रध्देचा वेगळाच रंग भरला गेला. श्रीगणपती अथर्व शिर्ष आणि भगवत गितेतील १५ व्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. एक सूर, एक ताल असा मेळ जमल्याने वातावरण भारुन गेले. यावेळी मार्गदर्शक शिला उपाध्याय, माया उपाध्याय, सुनिता सोमानी, सरिता उपाध्याय यांनी मुलांचा उत्साह वाढविला.