हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकांवर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:23+5:30

राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी दोनदा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावरच नांगर फिरवल्याची घटना गोवरी येथे घडली. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

The desperate farmer turned the plow on the soybean crop | हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकांवर फिरवला नांगर

हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकांवर फिरवला नांगर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी दोनदा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावरच नांगर फिरवल्याची घटना गोवरी येथे घडली. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे तीन एकरातील बियाणे उगवले नाही. नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची पेरणी करूनही उगवले नसल्याने त्यांनी पुन्हा सोयाबीनची पेरणी केली. मात्र बियाणे उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरविले.

कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी
राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बहुतांश सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. राजुरा येथील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहे, अशी माहिती राजुरा तालुका कृषी अधिकारी जी.के. कडलग यांनी दिली.

 

Web Title: The desperate farmer turned the plow on the soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती