शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

दोन महिन्यानंतरही गोवरी येथील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST

शासनाचे काम अन् वर्षभर थांब अशी पूरग्रस्त नागरिकांची बिकट अवस्था झाली आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथे २२ जुलैला पूर ...

शासनाचे काम अन् वर्षभर थांब अशी पूरग्रस्त नागरिकांची बिकट अवस्था झाली आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथे २२ जुलैला पूर आला. सारे काही व्यवस्थित सुरू असताना काही कळायच्या आत नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पाहता पाहता पुराचे पाणी गावात शिरले. क्षणार्धात शेकडो कुटुंबीयांचा सुखाचा संसार पाण्याखाली आला. घरातील सर्व साहित्य,अन्नधान्य जीवन उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुख समाधानाचा संसार पाण्यात बुडाला. पूर ओसरल्यानंतर शासनाने गोवरी येथील घरांचे आणि पुरामुळे बुडालेल्या शेतीचे तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले. शासनाच्या आदेशानुसार गोवरीचे तलाठी सुनील रामटेके यांनी कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार यांना सोबत घेऊन पूरग्रस्त भागातील पंचनामा करून पूरबुडीचा अहवाल शासनाला सादर केला. आज जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरी गोवरी येथील पूरग्रस्त नागरिकांना शासनाची मदत मिळाली नाही.त्यामुळे पूरग्रस्त नागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

210921\img_20210921_144120.jpg

दोन महिन्यानंतरही गोवरी येथील पूरग्रस्त मदतीपासून वंचित