शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नातीला नोकरी नाकारणे हा भेदभाव; कोळसा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात हाय कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:50 IST

Chandrapur : कोळसा प्रकल्पांसाठी जमीन गमावलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जमीनमालकांच्या नातीला नोकरीसाठी पात्र ठरविताना केवळ 'कुटुंब' या संकल्पनेची अरुंद व्याख्या करून त्यांना नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा प्रकल्पांसाठी जमीन गमावलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जमीनमालकांच्या नातीला नोकरीसाठी पात्र ठरविताना केवळ 'कुटुंब' या संकल्पनेची अरुंद व्याख्या करून त्यांना नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती अनिल किल्लोर व न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने तानेबाई नारायण आडवे व यशश्री सुरेश आडवे विरुद्ध कोल इंडिया लिमिटेड, वेकोली प्रशासन व राजुरा क्षेत्रीय अधिकारी या प्रकरणात हा आदेश दिला. न्यायालयाने १० जुलै २०२५ रोजी कोळसा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जमीनमालकाच्या नातीला नोकरी नाकारत दिलेले पत्र रद्दबातल ठरविले. तसेच संबंधित तरुणीच्या नोकरीच्या मागणीचा पुनर्वसन व पुनर्स्थापन धोरणानुसार नव्याने विचार करण्याचे निर्देशही कोळसा कंपनीला दिले.

या प्रकरणात जमीन गमावलेल्या शेतकरी कुटुंबातील आजी व नात यांच्यावतीने अॅड. दीपक चटप यांनी बाजू मांडली. नातीला नोकरी नाकारणे हे मनमानी व भेदभावपूर्ण असून लिंगसमतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. कोळसा कंपन्यांच्यावतीने अॅड. सी. एस. समुद्रे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अॅड. चटप यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत नातीला केवळ त्या कारणावरून नोकरी नाकारणे कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.

४७ शेतकऱ्यांच्या वतीने याचिका, ७ एप्रिलला पुढील सुनावणी

दरम्यान, यापूर्वी ११ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयातही न्यायालयाने जमिनीबाबत दिवाणी वाद प्रलंबित असल्याच्या कारणावरून प्रकल्पग्रस्तांना नोकरी नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्य पार्श्वभूमीवर अॅड. चटप यांनी नोकरी नाकारलेल्या सुमारे ४७ शेतकऱ्यांच्यावतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या असून, न्यायालयाने वेकोलि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणांची पुढील सुनावणी ७ एप्रिल रोजी होणार आहे. हा निर्णय प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत कायदेविशेषज्ञांनी व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Denying job to granddaughter of land loser is discrimination: High Court

Web Summary : Nagpur High Court ruled denying jobs to land losers' granddaughters is discriminatory. The court quashed a coal company's rejection letter and ordered reconsideration based on resettlement policies. This decision offers relief to project-affected families.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर