वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:50+5:302021-02-11T04:29:50+5:30
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी चंद्रपूर :जिल्ह्यात विविध योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, ...

वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
चंद्रपूर :जिल्ह्यात विविध योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. खरीप हंगामातही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
साठगाव-काकेपार रस्त्याची दुरुस्ती करा
चंद्रपूर : चंद्रपूर, भंडारा तसेच नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या साठगाव ते काकेपार रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी विनोद गावंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
अपघाताची शक्यता
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडीयम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडीयम लावल्यास अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.
जनावरांचा बंदोबस्त करावा
मूल : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. नगरपरिषदने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
प्लास्टिकबंदी कागदावरच
चंद्रपूर . चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी प्लास्टिकची विक्री सुरू आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम बघता राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली. त्यानंतर त्याचा वापर न करण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, सध्या मोहीम थंडावली आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तुळशीनगरातील रस्त्यांची दुरवस्था
चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उमा नदीवरील पुलाची उंची वाढवा
सिंदेवाही : तालुक्यातील कळमगावजवळील उमा नदीवर अस्तित्वात असलेला पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. कळमगाव (गन्ना) परिसरातील मोहाली विसापूर, कुकडहेती, चारगाव व इतर गावांना उमा नदीला पूर आल्यास २० कि.मी. अंतर कापून सिंदेवाहीला जावे लागते.