आठवडी बाजार हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:24+5:30
मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी बाजार पसरला आहे. सदर दोन्ही रस्ते अरूंद आहे. त्यातच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे नागरिकांना घरी जाताना त्रास होत आहे.

आठवडी बाजार हटवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : किल्ला वार्ड व बाजार वार्ड येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर बाजार येथून हटवावा, जर बाजार हटवित नसाल तर परिसरातील नागरिकांकडून घर टॅक्स घेणे बंद करा, अशा आशयाचे निवेदन नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे भद्रावतीत नवे राजकारण होण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी बाजार पसरला आहे. सदर दोन्ही रस्ते अरूंद आहे. त्यातच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे नागरिकांना घरी जाताना त्रास होत आहे. भाजी विक्रेते लांबलचक दुकान लावून बसत असल्यामुळे अनेकवेळा येथील नागरिकांचे भांडण सुद्धा होत आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी नगरप्ािरषदेकडे वेळ नाही. किमान रस्त्यावरील अतिक्रम हटवून या भाजी व्यावसायिकांना हटविणे गरजेचे असतानाही नगर परिषद प्रशासन या विकेत्यांना रस्त्यावर बसण्यासाठी मुक संमती देत असल्याची स्थिती सध्या येथे आहे. त्यामुळे आता नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सचिव राजु गौणवार यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मागणीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे.