शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

५३ हजार ३३६ शेतकऱ्यांना ३१२ कोटी ४४ लाखांची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

चंद्रपूर : खरीप हंगामात विविध बँकांतून एक लाख ४ हजार १६४ शेतकऱ्यांना ७५५.६४ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप झाले. ...

चंद्रपूर : खरीप हंगामात विविध बँकांतून एक लाख ४ हजार १६४ शेतकऱ्यांना ७५५.६४ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप झाले. गरीब व गरजू नागरिकांसाठी २२ शिवभोजन केंद्रातून सुमारे सहा लाख शिवभोजन थाळी केवळ पाच रुपये दरात उपलबध करून दिली. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अतिरिक्त ७०० रुपये बोनस देणारे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी शासन हे देशातील एकमेव सरकार आहे. याचा थेट फायदा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे व सर्व विभागप्रमुख, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण ठेवले. पूरग्रस्त भागासाठी शासनातर्फे ४२ कोटीची मदत मंजूर करून त्यातील ३६ कोटी मदत वाटप केले. ५९ केंद्रांवरून आतापर्यंत चार लाख ३७ हजार क्विंटल धान खरेदी झाली. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. प्रकल्पाकरिता एक हजार कोटीव्यतिरिक्त अधिकचे ५०० कोटी म्हणजे दरवर्षी दीड कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविल्याची माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. सुरुवातीला संविधानामधील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धा तसेच पोलीस दलातील एएसआय लिलेश्वर वऱ्हाडमारे व विजय बोरीकर यांना गुणवत्ता सेवा पदक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सत्कार केला. संचालन मोंटू सिंग व मंगला घागी यांनी केले.

बचत गटांना कर्ज वाटपात राज्यात अग्रेसर

बचत गटांना कर्ज वाटप करण्यात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. पोषण अभियानामध्ये उत्तम काम करीत पाच हजार परसबागांची निर्मिती केली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देशी विदेशी पर्यटक भेटीवर येतात. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ताज ग्रुपबरोबर करार करून पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. महेन्द्रा क्लब, लि-मेरीडीअन, रेडीसन ब्ल्यू यांसारखी पंचतारांकीत हॉटेल्स या भागात येऊ पाहत आहेत. यातून महसूल व रोजगाराच्या संधी वाढतील, असेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.