शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

सोसायट्यांची कर्जवसुली यंदा ४५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST

नागभीड : यावर्षी सोसायट्यांची कर्जवसुली ४५ टक्क्यांच्या आत झाली आहे. विक्री केलेल्या धानाची देयके वेळेवर न मिळाल्याचा हा परिणाम ...

नागभीड : यावर्षी सोसायट्यांची कर्जवसुली ४५ टक्क्यांच्या आत झाली आहे. विक्री केलेल्या धानाची देयके वेळेवर न मिळाल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार यावर्षी मार्चअखेर ३,९८५ सभासदांची १५ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयांची वसुली प्राप्त झाली आहे.

मागील काही वर्षांपासून शासनाकडून शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेती करण्यासाठी पतपुरवठा घेतल्यानंतर हा पतपुरवठा मार्च महिन्यात परत केला, तर या पतपुरवठ्यावर व्याज आकारण्यात येत नाही, अशी माहिती आहे. या योजनेचा या तालुक्यातील शेकडो शेतकरी लाभ घेत आहेत.

डिसेंबर महिन्यात धानाची फसल हाती आली की, जानेवारी ते मार्च या महिन्यांत शेतकरी खासगी व्यापारी व कृ.उ.बा.स.मध्ये धानाची विक्री करायचे व आलेल्या देयकातून घेतलेल्या पतपुरवठ्याची परतफेड करायचे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नागभीड तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाने धान खरेदी सुरू केली आहे. या दोन्ही प्रतिष्ठानांवर मोठ्या प्रमाणावर धान खरेदी होत आहे. यावर्षीही या दोन्ही प्रतिष्ठानांनी विक्रमी धान खरेदी केली. मात्र, या प्रतिष्ठानांना फेब्रुवारीच्या शेवटी व मार्च महिन्यांत खरेदी केलेल्या धानाची देयके शासनाकडून प्राप्त झाली नाहीत. परिणामी, ही प्रतिष्ठाने शेतकऱ्यांची देयके अदा करू शकली नाहीत, अशी माहिती आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी मागील वर्षी घेतलेला पतपुरवठा अदा करू शकले नाहीत. परिणामी सोसायट्या व बँकांची कर्जवसुली झाली नाही.

बॉक्स

१५ कोटी ५२ लाखांचीच वसुली

एकूण ३ हजार ९८५ सभासदांकडून १५ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयांचीच वसुली प्राप्त झाली असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

विक्री केलेल्या धानाचे चुकारे वेळेवर न मिळणे हे कर्जवसुलीत अडचणीचे ठरले असले तरी यामागे दुसरेही एक कारण आहे. जेव्हा- जेव्हा शासनाकडून कर्जमाफी केली जाते, तेव्हा- तेव्हा कर्जमाफीचा लाभ हा ‘थकीत’ शेतकऱ्यांनाच होत आला आहे. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना आजवर या कर्जमाफीचा लाभ झाला नाही. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली होती; पण ही घोषणा अद्यापही हवेतच आहे. याचा राग म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी घेतलेले कर्ज भरले नाही, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.