शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांची कर्जवसुली यंदा ४५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST

नागभीड : यावर्षी सोसायट्यांची कर्जवसुली ४५ टक्क्यांच्या आत झाली आहे. विक्री केलेल्या धानाची देयके वेळेवर न मिळाल्याचा हा परिणाम ...

नागभीड : यावर्षी सोसायट्यांची कर्जवसुली ४५ टक्क्यांच्या आत झाली आहे. विक्री केलेल्या धानाची देयके वेळेवर न मिळाल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार यावर्षी मार्चअखेर ३,९८५ सभासदांची १५ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयांची वसुली प्राप्त झाली आहे.

मागील काही वर्षांपासून शासनाकडून शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेती करण्यासाठी पतपुरवठा घेतल्यानंतर हा पतपुरवठा मार्च महिन्यात परत केला, तर या पतपुरवठ्यावर व्याज आकारण्यात येत नाही, अशी माहिती आहे. या योजनेचा या तालुक्यातील शेकडो शेतकरी लाभ घेत आहेत.

डिसेंबर महिन्यात धानाची फसल हाती आली की, जानेवारी ते मार्च या महिन्यांत शेतकरी खासगी व्यापारी व कृ.उ.बा.स.मध्ये धानाची विक्री करायचे व आलेल्या देयकातून घेतलेल्या पतपुरवठ्याची परतफेड करायचे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नागभीड तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाने धान खरेदी सुरू केली आहे. या दोन्ही प्रतिष्ठानांवर मोठ्या प्रमाणावर धान खरेदी होत आहे. यावर्षीही या दोन्ही प्रतिष्ठानांनी विक्रमी धान खरेदी केली. मात्र, या प्रतिष्ठानांना फेब्रुवारीच्या शेवटी व मार्च महिन्यांत खरेदी केलेल्या धानाची देयके शासनाकडून प्राप्त झाली नाहीत. परिणामी, ही प्रतिष्ठाने शेतकऱ्यांची देयके अदा करू शकली नाहीत, अशी माहिती आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी मागील वर्षी घेतलेला पतपुरवठा अदा करू शकले नाहीत. परिणामी सोसायट्या व बँकांची कर्जवसुली झाली नाही.

बॉक्स

१५ कोटी ५२ लाखांचीच वसुली

एकूण ३ हजार ९८५ सभासदांकडून १५ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयांचीच वसुली प्राप्त झाली असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

विक्री केलेल्या धानाचे चुकारे वेळेवर न मिळणे हे कर्जवसुलीत अडचणीचे ठरले असले तरी यामागे दुसरेही एक कारण आहे. जेव्हा- जेव्हा शासनाकडून कर्जमाफी केली जाते, तेव्हा- तेव्हा कर्जमाफीचा लाभ हा ‘थकीत’ शेतकऱ्यांनाच होत आला आहे. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना आजवर या कर्जमाफीचा लाभ झाला नाही. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली होती; पण ही घोषणा अद्यापही हवेतच आहे. याचा राग म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी घेतलेले कर्ज भरले नाही, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.