शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'त्या' वाघिणीच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले, शेतकऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:12 IST

वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली.

ठळक मुद्देबैलबंडीने दीड किलोमीटर अंतरावर नेला वाघिणीचा मृतदेह

भद्रावती (चंद्रपूर) : १५ दिवसांपूर्वी भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा ) शिव रस्त्यालगत वाघिणीचा मृतदेह आढळला होता. हा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपी गवसत नव्हता. अखेर वनविभागाचे हात आरोपीपर्यंत पोहचलेच. याप्रकरणी कोंढा येथील शेतकरी तुकाराम वामन मत्ते (५३) याला वन विभागाने अटक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने घटनास्थळापासून तब्बल दीड किलोमीटर अंतरावर वाघिणीचा मृतदेह बैलबंडीने नेल्याचे तपासात पुढे आले आहे.

तुकाराम यांची कोंढा येथे स्वतःच्या मालकीची शेती आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली.

ही घटना तुकाराम यांना माहिती होताच त्यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृत वाघिणीला स्वतःच्या बैलबंडीत टाकून शेतापासून दीड किमी अंतरावरील चालबर्डी शिव रस्त्यावर आणून टाकले होते. वन विभागाच्या चौकशीनंतर आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे, क्षेत्र सहायक एन. व्ही. हनवते, वनरक्षक प्रशांत गेडाम यांनी केली.

ताडपत्रीच्या तुकड्यावरून उलगडा

मृत वाघिणीचा मृतदेह ज्या परिसरात आढळला त्या ठिकाणी वन विभागाला ताडपत्रीचा तुकडा आढळला होता. या तुकड्यावरून परिसरातील शेतात जाऊन चौकशी केली असता अशाच पद्धतीचा तुकडा तुकाराम मत्ते यांच्या शेतात सापडला. वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता सत्य बाहेर आले. या ताडपत्रीत वाघिणीचा मृतदेह गुंडाळून बैलबंडीत नेल्याची कबुली आरोपीने दिल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTigerवाघDeathमृत्यू