शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST

चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे कमी जास्त प्रमाणात सर्वांचेच मोठे नुकसान झाले. अनेकांना आपल्या जवळच्यांचा जीव गमवावा लागला तर काहींचा रोजगार ...

चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे कमी जास्त प्रमाणात सर्वांचेच मोठे नुकसान झाले. अनेकांना आपल्या जवळच्यांचा जीव गमवावा लागला तर काहींचा रोजगार गेला आहे. मात्र यामध्ये दिव्यांग तसेच अंध व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

कोरोनामुळे मागील वर्षभरापासून संकटाचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका दिव्यांगाना बसला आहे. शासनाने नोंदणीकृत मजूर तसेच इतरांना मदतीचा हात समोर केला आहे. मात्र अंधाना अद्यापही आधार नसून केवळ निराधार म्हणून एक हजार रुपयेच मिळत आहे. मात्र महागाईच्या काळामध्ये हजार रुपयांत त्यांचे काहीच भागत नसल्याचे चित्र आहे.

काही अंधांची परिस्थिती बिकट झाली आहे. लाॅकडाऊनपूर्वी मिळेल ते काम तसेच आपल्या कौशल्याच्या भरवशावर ते कमाई करून पोट भरत होते. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यातच मागील महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु झाल्यामुळे जवळचे होते ते सर्वच संपल्यामुळे आता जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

बाॅक्स

निराधार भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी

शासनाकडून निराधारांना दरमहा एक हजार रुपये मानधन दिल्या जाते. मात्र सध्याची महागाई बघता एक हजार रुपयांमध्ये काहीच होत नाही. त्यामुळे निराधार अंधांना दरमहा पाच हजार रुपये देण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

बाॅक्स

उदरनिर्वाहासाठी काही अंध नागरिक रेल्वे, बस, बसस्थानकामध्ये, तसेच इतर ठिकाणी छोटेमोठे साहित्य विक्री करतात. मात्र लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे सर्वांचेच व्यवसाय बंद झाले. परिणामी कसे जगायचे, असा प्रश्न सध्या त्यांना पडला आहे.

कोट

आधारही एकमेकांचाच

कोरोना काळ प्रत्येकांसाठी अडचणीचा आहे. मागील वर्षी आपण उच्च न्यायालयाला पत्र पाठवून निराधारांना पाच हजार रुपये मानधन देण्यासाठी शासनाला सांगण्यासाठी विनंती केली होती. मात्र यावर अद्यापपर्यंत काहीच झाले नाही. निराधारांना शासनाकडून एक हजार रुपये मानधन मिळते. मात्र यात त्यांचे काहीच होत नाही.

-रवींद्र ताकसांडे

सचिव, राष्ट्रीय अंध जनकल्याण बहुउद्देशीय संस्था