शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोरपना तालुका बोगस डॉक्टरांच्या तावडीत

By admin | Published: May 12, 2014 11:28 PM

तालुक्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे तालुकावासीयांना बरेच जाणवायला लागले.

कोरपना : तालुक्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे तालुकावासीयांना बरेच जाणवायला लागले. दम्यासारखे विकार अनेकांना जडले असून सद्यस्थितीत तालुक्यात असलेल्या वैद्यकीय सेवा कुचकामी ठरत आहेत.

५४ ग्रामपंचायती अन् ११३ गावे कोरपना तालुक्यात समाविष्ट आहेत. कोरपना व गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालय तर नारंडा, मांडवा आणि विरूर (गाडेगाव) येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या पाच ठिकाणाहून तालुकावासीयांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात येतात. तालुका स्थळी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि औषधांची नेहमीच वानवा राहते. आरोग्य केंद्रातही डॉक्टर असले तर, आरोग्य सेविका उपस्थित नसतात. अशा वेळी नाईलाजाने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक खेडेगावात वैद्यकीय सेवा कोसोदूर आहेत. गंभीर आजार उद्भवल्यास रुग्णांना मृत्यूला कवटाळावे लागते. अशी गंभीर स्थिती असताना उपलब्ध शासकीय वैद्यकीय सेवाबाबत तक्रारी वाढतच आहेत.

ग्रामीण भागात शासनाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे निर्माण केले. काही निवडक ठिकाणी त्याद्वारे गोरगरीब जनतेला चांगली सेवा मिळतही आहे. मात्र अनेक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राबाबत समस्या व तक्रारींचा पाढा वाढत आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बोगस प्रमाणपत्र मिळवून अथवा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या रुग्णालयात कंपाऊडर म्हणून काम करून ग्रामीण भागात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकदाही अशा डॉक्टरांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची तपासणी झाली नाही. त्यामुळे आजघडीला नांदाफाटा, गडचांदूर, नारंडा, कोरपना, पिपर्डा, अंतरगाव, कढोली, सोनुर्ली, पारडी परिसरात पन्नासावर असे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागातील अशिक्षित जनता ‘देव म्हणजे डॉक्टर’ मानतात. परंतु काही डॉक्टर सध्या वैद्यकीय व्यवसाय सेवा म्हणून न करता तो ग्रामीण व शहरी भागात धंदा झाला आहे. त्यामुळे अधिक नफा मिळविण्याच्या नादाने काही डॉक्टर रुग्णांची लुबाडणूक करू लागले आहेत.

ग्रामीण भागातील १0 वी, १२ वी किंवा पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणांना कंपाऊंडर म्हणून रुग्णालयात कामास ठेवायचे त्यानंतर ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करायला लावायचा आणि आपल्या रुग्णालयात पाठवायला लावायचे अशी साखळी बर्‍याच रुग्णालयात सुरू आहे. यातूनच ग्रामीण भागातील दुर्गम भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)