शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सिलिंडर भाववाढ; गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 13:34 IST

Chandrapur News सिलिंडरचे सातत्याने वाढलेले भाव गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

ठळक मुद्दे महिलांचा डोळ्यात पुन्हा पाणी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : ग्रामीण महिलांना डोळ्याचे आजार होऊ नये तसेच प्रदूषणाला आळा बसून जंगल कटाई थांबावी यासाठी केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून गरीब कुटुंबीयांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरचे वितरण केले. मात्र सिलिंडरचे सातत्याने वाढलेले भाव गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाची योजना चांगली असतानाही महिलांना मात्र आता सरपण गोळा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

पंतप्रधान गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात अल्प उत्पन्न असलेल्या महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले. यामुळे ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मोलमजुरी करून चार पैसे मिळवून जगणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलिंडर मिळाला मात्र सातत्याने सिलिंडरचे वाढणारे भाव डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. कसेबसे करून आजपर्यंत सिलिंडर भरला मात्र आता अवाक्याबाहेर जात आहे. विशेष म्हणजे, आता शासनाने केरोसिनही देणे बंद केल्यामुळे महिलांना जंगलामध्ये जीव धोक्यात टाकून सरपण गोळा केल्याशिवाय पर्यायच नाही.

सिलिंडर भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून

यावर्षी कोरोना संकटामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. यातून कसाबसा मार्ग काढत जीवन जगणे सुरु आहे. यातही महागाई तसेच सिलिंडरचे दर वाढल्यामुळे गरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडिंडरचे दर वाढले त्यामुळे भरण्याचा प्रश्न असतानाच केरोसीनही बंद आहे. त्यामुळे महिलांना सरपण गोळा करावे लागत आहे. मात्र सरपण आणणेही आता धोकादायक ठरत आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वन्यप्राणी मोठ्या संख्येने असल्यामुळे एकीकडे आड दुसरीकडे विहिर अशी काहीशी अवस्था ग्रामीण महिलांची झाली आहे.

गृहिणींच्या प्रतिक्रिया

उज्ज्वला गॅस मिळाल्यामुळे आनंद झाला. मात्र तो काही दिवसांसाठीचाच होता. सातत्याने वाढणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सिलिंडर भरणे परडणारे नाही. त्यातच महागाई वाढत आहे. त्यामुळे महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने सिलिंडरच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.

- सुनंदा देशमुख

किरमीटी

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे गरिबांना जगणे कठीण झाले आहे. असे असतानाच गॅस सिलिंडरची भाववाढ करून शासनाने गरिबांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सिलिंडरचे दर कमी करावे. सध्या सरपण गोळा करून चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

कुंदा नवघडे, मिंथुर

ग्रामीण भागात लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजनेतून गॅससिलिंडर मिळाले. मात्र आता सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे गरिबांना सिलिंडर भरणे कठीण जात आहे. शासनाने सिलिंडरचे भाव कमी करून गरिबांना दिलासा देणे गरजेचे आहे.

सरकारने गॅससिलिंडर दिल्यामुळे आनंद झाला. मात्र सासत्याने वाढणारे दर बघून चुलीवरच स्वयंपाक करणे परवडणारे असल्यामुळे पुन्हा चूल पेटवली आहे. सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून गोरगरिबांना परवडेल इतक्या कमी किमतीवर तो उपलब्ध करून द्यावा.

वाढत्या महागाईमुळे मोठी अडचण जात आहे. प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत आहे. गॅससिलिंडरचे दर वाढले आहे. त्यातच सबसिडीही देणे बंद केले आहे. त्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. सिलिंडरचे भाव कमी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर