शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सिलिंडर भाववाढ; गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 13:34 IST

Chandrapur News सिलिंडरचे सातत्याने वाढलेले भाव गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

ठळक मुद्दे महिलांचा डोळ्यात पुन्हा पाणी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : ग्रामीण महिलांना डोळ्याचे आजार होऊ नये तसेच प्रदूषणाला आळा बसून जंगल कटाई थांबावी यासाठी केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून गरीब कुटुंबीयांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरचे वितरण केले. मात्र सिलिंडरचे सातत्याने वाढलेले भाव गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाची योजना चांगली असतानाही महिलांना मात्र आता सरपण गोळा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

पंतप्रधान गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात अल्प उत्पन्न असलेल्या महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले. यामुळे ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मोलमजुरी करून चार पैसे मिळवून जगणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलिंडर मिळाला मात्र सातत्याने सिलिंडरचे वाढणारे भाव डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. कसेबसे करून आजपर्यंत सिलिंडर भरला मात्र आता अवाक्याबाहेर जात आहे. विशेष म्हणजे, आता शासनाने केरोसिनही देणे बंद केल्यामुळे महिलांना जंगलामध्ये जीव धोक्यात टाकून सरपण गोळा केल्याशिवाय पर्यायच नाही.

सिलिंडर भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून

यावर्षी कोरोना संकटामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. यातून कसाबसा मार्ग काढत जीवन जगणे सुरु आहे. यातही महागाई तसेच सिलिंडरचे दर वाढल्यामुळे गरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडिंडरचे दर वाढले त्यामुळे भरण्याचा प्रश्न असतानाच केरोसीनही बंद आहे. त्यामुळे महिलांना सरपण गोळा करावे लागत आहे. मात्र सरपण आणणेही आता धोकादायक ठरत आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वन्यप्राणी मोठ्या संख्येने असल्यामुळे एकीकडे आड दुसरीकडे विहिर अशी काहीशी अवस्था ग्रामीण महिलांची झाली आहे.

गृहिणींच्या प्रतिक्रिया

उज्ज्वला गॅस मिळाल्यामुळे आनंद झाला. मात्र तो काही दिवसांसाठीचाच होता. सातत्याने वाढणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सिलिंडर भरणे परडणारे नाही. त्यातच महागाई वाढत आहे. त्यामुळे महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने सिलिंडरच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.

- सुनंदा देशमुख

किरमीटी

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे गरिबांना जगणे कठीण झाले आहे. असे असतानाच गॅस सिलिंडरची भाववाढ करून शासनाने गरिबांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सिलिंडरचे दर कमी करावे. सध्या सरपण गोळा करून चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

कुंदा नवघडे, मिंथुर

ग्रामीण भागात लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजनेतून गॅससिलिंडर मिळाले. मात्र आता सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे गरिबांना सिलिंडर भरणे कठीण जात आहे. शासनाने सिलिंडरचे भाव कमी करून गरिबांना दिलासा देणे गरजेचे आहे.

सरकारने गॅससिलिंडर दिल्यामुळे आनंद झाला. मात्र सासत्याने वाढणारे दर बघून चुलीवरच स्वयंपाक करणे परवडणारे असल्यामुळे पुन्हा चूल पेटवली आहे. सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून गोरगरिबांना परवडेल इतक्या कमी किमतीवर तो उपलब्ध करून द्यावा.

वाढत्या महागाईमुळे मोठी अडचण जात आहे. प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत आहे. गॅससिलिंडरचे दर वाढले आहे. त्यातच सबसिडीही देणे बंद केले आहे. त्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. सिलिंडरचे भाव कमी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर