शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

नागरिक पितात गढूळ पाणी

By admin | Updated: May 18, 2017 01:23 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील प्रकार : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष निळकंठ नैताम । लोकमत न्यूज नेटवर्क पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही या गावातील नागरिक अंधारी नदीच्या पात्रातील मलमुत्र साचलेले अशुद्ध व गढूळ पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. नदीच्या पात्रामध्ये परिसरातील अनेक पाळीव जनावरे पाणी पिण्यासाठी जात असतात आणि त्याठिकाणी बसतात. त्यामुळे तिथे त्यांचे मल, मुत्र साचत असते. याच ठिकाणी परिसरातील निधन झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधीसुद्धा केला जातो. ते पाणीसुध्दा नदीतील पात्रात असलेल्या विहीरीमध्ये जात असते. तिथूनच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळाद्वारे ग्रामस्थाला पाणी पुरवठा केला जातो. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरू असताना पाणी काही प्रमाणात बरे असते. परंतु नदीचे पात्र जेव्हा एप्रिल महिन्यात कोरडे होते, तेव्हा खड्डयामध्ये साचलेल्या घाण पाण्यावरच या गावातील नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. नळाद्वारे पाणी येत असताना या पाण्यातून दुर्गंधी येत असते. परंतु दुसरी कुठलीच उपाययोजना नसल्याने नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना हेच पाणी प्यावे लागत आहे. हा प्रकार याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार गावकऱ्यांनी निवेदन देऊनसुद्धा याठिकाणी अजूनपर्यंत पाण्याची कुठलीच पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. गेल्या १५ वर्षांपासून अंधारी नदीच्या पात्रावर असलेल्या विहीरीतील गाळ काढला नसून त्या विहीरीमध्ये जवळपास ८ ते १० फुट गाळ साचलेला आहे. या गावातील मजूर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सकाळी कामावर जात असतात. कामावरून आल्यावर पाण्यासाठी उन्हामध्ये दुरवरून विहीरीचे पाणी त्यांना आणावे लागते. याठिकाणी पाण्याची पातळी फार खोलवर असल्याने विहीरींनासुद्धा फारसे पाणी नाही. आपल्या सोबतच त्यांना शेतात राबणाऱ्या जनावरांनासुद्धा पाणी द्यावे लागते. स्थानिकांना इतर कामे बाजुला सारून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची पाळी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांवर आली आहे.