शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वांनाच जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने वाद टाळले जातात. त्यासाठीच शनिवार, दि.१० हजारांपेक्षा अधिक प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. सोप्या प्रक्रियेतून प्रकरणे निकाली काढून फायदे मिळविण्याची ही मोफत नामी संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली. नागरिकांना आपली प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे समक्ष येऊन किंवा ०७१७२-२७१६७९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. लाेकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे  चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयात एकाच दिवशी होणाऱ्या लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, कलम १३८ एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे) वित्त संस्था, बँक कर्जवसुली, वाहन अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू व कौटुंबिक वाद, वीज ॲक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस व न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी व वीजबिल आपसी समझोतासाठी ठेवण्यात येणार आहे. 

शनिवार होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा १० हजारांहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवली जात आहेत. या अदालतीत विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.- कविता अग्रवाल,  मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत