शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वांनाच जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने वाद टाळले जातात. त्यासाठीच शनिवार, दि.१० हजारांपेक्षा अधिक प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. सोप्या प्रक्रियेतून प्रकरणे निकाली काढून फायदे मिळविण्याची ही मोफत नामी संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली. नागरिकांना आपली प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे समक्ष येऊन किंवा ०७१७२-२७१६७९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. लाेकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे  चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयात एकाच दिवशी होणाऱ्या लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, कलम १३८ एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे) वित्त संस्था, बँक कर्जवसुली, वाहन अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू व कौटुंबिक वाद, वीज ॲक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस व न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी व वीजबिल आपसी समझोतासाठी ठेवण्यात येणार आहे. 

शनिवार होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा १० हजारांहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवली जात आहेत. या अदालतीत विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.- कविता अग्रवाल,  मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत