शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली, अधिकारी - कर्मचाऱ्यांवरच होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०७ - (अ) नुसार सन २०१५ - १६चे चंद्रपूर महानगर पालिकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. ३१ ...

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०७ - (अ) नुसार सन २०१५ - १६चे चंद्रपूर महानगर पालिकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेसमोर हा अहवाल मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. २०१५ - १६ या वर्षात केलेल्या विविध कामांमध्ये सुमारे २०० कोटींची अनियमितता झाल्याचा ठपका लेखा विभागाने ठेवला आहे. याशिवाय ७१ लेखा आक्षेप नोंदविल्याचे अहवालातून पुढे आले. परिणामी काँग्रेसचे मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सुनीता लोढीया, नंदू नागरकर व अन्य काँग्रेस नगरसेवकांनी ऑनलाईन सभेत अनेक प्रश्न विचारून दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आणि ऑनलाईन सभेतून बाहेर निघाले. त्यानंतर मनपासमोर निदर्शने केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रपुरात आले असता त्यांच्याकडेही तक्रारी केल्या. तेव्हापासून हा विषय शहरात चर्चेत आहे.

दोषींकडून १.७९ कोटी वसूल करावे लागणार

काँग्रेस नगरसेवकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चौकशीचे संकेत देताच राजेश मोहिते यांनी माध्यमांकडे स्पष्टीकरण पाठविले आणि तत्कालीन महापौर व पदाधिकाऱ्यांच्या बचावासाठी सरसावले. लेखापरीक्षण अहवालानुसार, आक्षेपाधीन रक्कम १९८ कोटी आणि वसुलीपात्र रक्कम १.७९ कोटी असल्याची कबुलीही आयुक्तांनी या स्पष्टीकरणात दिली तसेच त्रुटींची पूर्तता करून लेखा आक्षेप वगळता येतात, असा दावाही केला आहे.

सभेच्या नोटीसमधून माहिती उघडकीस

३१ जून २०२१च्या ऑनलाईन सभेत विषय क्र. ६ प्रमाणे लेखापरीक्षण अहवाल मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ करून सभेतून बाहेर निघाले होते. येत्या २३ जून २०२१ रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेची नोटीस नगरसेवकांना पाठविण्यात आली आहे. या नोटीससोबत मागील सभेचा कार्यवृत्तही जोडला आहे. त्यातील ठराव क्र. ६ मधील ‘लेखापरीक्षणात दोषी आढळलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा ठराव मंजूर’ अशी नोंद करण्यात आली. त्यामुळे तत्कालीन पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बळी जाण्याचीच शक्यता अधिक असून, पुढील सभेत काँग्रेसचे नगरसेवक या ठरावाबाबत कोणता पवित्रा घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.