जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:35+5:30

३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

Corona's first victim in the district | जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

ठळक मुद्देनव्या २८ बाधितांची भर, जिल्हाधिकारी कार्यालयातील ११४ जणांचे स्वॅब घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णात वाढ होत आहे. असे असले तरी आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला नव्हता. ही बाब जिल्हा प्रशासनासह नागरिकांना दिलासा देणारी होती. अखेर शनिवारी चंद्रपूर येथील रहेमत नगरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला.
३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये शनिवारी आणखी २८ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. आता एकूण बाधितसंख्या ५५१ झाली असून त्यापैकी ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपर्कातील ११४ कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला, याचा शोध सुरू आहे.

आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेतले
ब्रह्मपुरी पंचायत समितीमधील एक पॉझिटिव्ह कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच दोनही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. केवळ जि. प. कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना काल दिवसभर प्रवेशद्वार ताटकळत राहावे लागले. लोकप्रतिनिधीं तर जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नव्हते. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेत कर्तव्यावर रुजू झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री उशिरा आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले.

ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्यावरच भर
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू झाली. मात्र शक्यतो ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्याकडेच शुक्रवारपासून भर दिला जात आहे. कुणीही व्यक्ती थेट कक्षात जावून संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिल्या. आज कार्यालयीन सुटी असल्याने परिसरात शुकशुकाट होता. सोमवारपासून दैनंदिन कामकाज सुरू झाल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात विनाकारण गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

Web Title: Corona's first victim in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.