शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्यला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST

बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य ...

बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात २ ऑॅक्टोबर २०१३ पासून सुरू झाली. ही योजना पूर्वी महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविली जात होती. मागील तीन वर्षांपासून ही योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली. पीडितांना किमान एक ते तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. मदतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असतो. सन २०१९ मध्ये १०३ प्रस्ताव आले. त्यापैकी केवळ ५७ प्रस्ताव मान्य झाले. त्यांना ३८ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले, तर सन २०२० मध्ये १५१ पैकी ७३ प्रस्ताव मान्य झाले असून, २५ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे वितरण करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे निधी आला नसल्याने अनेक पीडितांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

कोरोनामुळे पुनर्वसन मंडळाच्या बैठकीवर परिणाम

पीडितेचा अर्ज पोलीस ठाण्यामार्फत जिल्हा विधी व सेवा प्राधिकणकडे प्राप्त झाल्यानंतर या अर्जाची शहानिशा केली जाते. गोपनीय अहवाल मागविला जातो. दुसऱ्या योजनेतून लाभ मिळाला नाही, याची खात्री केली जाते. त्यानंतर पुनर्वसन मंडळाची बैठक होऊन या बैठकीत पीडितेला किती मदत द्यायचे हे ठरविले जाते. पीडितेला लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पुनर्वसन मंडळ प्रयत्न करतात. मात्र, कोरोनामुळे मंडळाच्या बैठकीवर परिणाम पडला आहे. त्यामुळे या कालावधीतील पीडित महिलांना वेळेवर मदत मिळण्यास अडचण जात आहे.