शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्यला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST

बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य ...

बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात २ ऑॅक्टोबर २०१३ पासून सुरू झाली. ही योजना पूर्वी महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविली जात होती. मागील तीन वर्षांपासून ही योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली. पीडितांना किमान एक ते तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. मदतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असतो. सन २०१९ मध्ये १०३ प्रस्ताव आले. त्यापैकी केवळ ५७ प्रस्ताव मान्य झाले. त्यांना ३८ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले, तर सन २०२० मध्ये १५१ पैकी ७३ प्रस्ताव मान्य झाले असून, २५ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे वितरण करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे निधी आला नसल्याने अनेक पीडितांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

कोरोनामुळे पुनर्वसन मंडळाच्या बैठकीवर परिणाम

पीडितेचा अर्ज पोलीस ठाण्यामार्फत जिल्हा विधी व सेवा प्राधिकणकडे प्राप्त झाल्यानंतर या अर्जाची शहानिशा केली जाते. गोपनीय अहवाल मागविला जातो. दुसऱ्या योजनेतून लाभ मिळाला नाही, याची खात्री केली जाते. त्यानंतर पुनर्वसन मंडळाची बैठक होऊन या बैठकीत पीडितेला किती मदत द्यायचे हे ठरविले जाते. पीडितेला लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पुनर्वसन मंडळ प्रयत्न करतात. मात्र, कोरोनामुळे मंडळाच्या बैठकीवर परिणाम पडला आहे. त्यामुळे या कालावधीतील पीडित महिलांना वेळेवर मदत मिळण्यास अडचण जात आहे.