कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:51+5:30
नियमानुसार एका महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापसाचे चुकारे वळते करणे आवश्यक होते. हे चुकारे देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकºयांच्या कापसाचे पैसे बँक खात्यात चुकाऱ्याची रकम जमा झाली नाही.

कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे अडले
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांना कापूस विकलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे कोरोनामुळे चुकारे अडकल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.
राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सीसीआयच्या शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापूसाची विक्री केली. नियमानुसार एका महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापसाचे चुकारे वळते करणे आवश्यक होते. हे चुकारे देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकºयांच्या कापसाचे पैसे बँक खात्यात चुकाऱ्याची रकम जमा झाली नाही. मार्च एंडिंगमध्ये बँक व सोसायटीकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा भरणा कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे कापसाचे चुकारे बँकेत जमा न केल्यामुळे हतबल झाला आहे. सीसीआयला कापूस विकल्याची रीतसर पावती शेतकऱ्याला देण्यात आली. कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांना अनेकांचे पैसे परत करायचे होते. चुकारे मिळण्यासाठी आधीच एक महिन्याचा कालावधी उलटला. त्यातच आता कोरोनोमुळे सर्व बाजारपेठ ठप्प झाली. शासनाने विविध विभागात केवळ २५ टक्के कर्मचाºयांनी सेवा देण्याचे आदेश जारी केले. परिणामी कापसाचे चुकारे करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा विलंब होणार आहे.
एक महिना उलटून गेला तरी सीसीआयने शेतकºयांच्या कापसाचे चुकारे बँकेत जमा केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. शासनाने कापसाच्या चुकºयाचे पैसे जमा केल्यास आधार मिळेल.
- रूपेश गेडेकर,
शेतकरी, पाचगाव