शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत ४६७ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या १२७ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सध्या शेतीकामे सुरु आहे. त्यामुळे कधी रुग्ण सापडेल आणि लॉकडाऊन होतील, याचा सध्यातरी नेम नाही.

ठळक मुद्देबरे होण्याचे प्रमाणही वाढले : शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनाने आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी कोरोनाचे पाय आता ग्रामीण भागातही घट्ट होऊ लागले आहे. वाढती रुग्णसंख्या सध्या जिल्हा प्रशासनासह, नागरिकांचा थरकाप उडविणारी ठरत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत ४६७ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या १२७ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सध्या शेतीकामे सुरु आहे. त्यामुळे कधी रुग्ण सापडेल आणि लॉकडाऊन होतील, याचा सध्यातरी नेम नाही. दोन महिन्यापूर्वी दिवसाआड एक दोन रुग्ण आठळणाºया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता दिवसाचा २० च्या संख्येने रुग्ण संख्या वाढत आहे. हा आकडा दर दिवशी वाढत आहे. ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक केंद्रामध्ये स्वॅब चाचणी सुरू करण्यात आली आहे. ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीमध्ये ही चाचणी सुरु करण्यात आली असून ३० हजारावर नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष ठरविण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकसंख्येमध्ये आतापर्यंत ५ प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्यात आले आहे. या भागात आत्तापर्यंत १८ कोरोना बाधित पुढे आले आहे. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २७ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे. दरम्यान, चंद्रपूर येथेही अ‍ॅन्टिजेन केंद्र सुरु करण्यात आले आहे. जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरु केलेले आहे. चाचणी करण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणी केंद्रामध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोना चाचण्याचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी केवळ १५ ते ३० मिनिटाचा आहे. दरम्यान, गडचांदूर येथेही अ‍ॅन्टिजेन चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.नागभीड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नगर परिषदेने जनता कर्फ्यूचे लावला आहे. नागभीड येथील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाºया पती-पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. या दोघांच्या संपर्कात कोण आणि किती जण आले. याचा शोध आरोग्य विभागातर्फे घेणे सुरु केले आहे. त्यानंतर आणखी चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने नागभीड येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजीपाला व्यावसायिक हा नागपूरवरून भाजीपाला खरेदी करून आणायचा आणि पत्नी हातगाडीवर नागभीड शहरात भाजीपाला विक्री करायची. या तीन-चार दिवसात तिने नागभीडमधील संपूर्ण जुन्या वस्तीत भाजीपाला विक्री केल्याचे बोलल्या जात आहे. औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.मूल आणि राजुरा येथे गुन्हा दाखलएकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे काही नागरिक नियम पाळायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनालाही कठोर व्हावे लागत आहे. दरम्यान, मूल आणि राजुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा शहरातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या एकाने मद्य प्राशन करून गोंधळ घातला. त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तर मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे बिहार राज्यातून आलेल्या आलेल्या मजुरांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश असतानाही साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईसमीलच्या संचालकांना नियम न पाळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या