शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

राईस मिलमधील दूषित पाणी थेट संरक्षित जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:13 IST

Chandrapur : वन्यप्राण्यांच्या जीवितासह अधिवासालाही धोक्याची शक्यता

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : संरक्षित जंगल, जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास व वन्यप्राण्यांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, या विपरीत चक्क राईस मिलमधील केमिकलयुक्त पाणी थेट संरक्षित जंगलात, वन्यप्राण्यांच्या अधिवासात सोडत असल्याचा प्रकार ब्रह्मपुरी वनविभागात कक्ष क्र. ८४१ मध्ये सुरू आहे.

या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांसह जंगलालाही धोका निर्माण होत आहे. याकडे ब्रहापुरी वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून उचित कारवाई होणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रह्मपुरी-नागभीड मुख्य महामार्गालगत डाव्या बाजूला असलेल्या एका राईस मिलधारकाकडून चक्क रस्त्याच्या खालून भूमिगत पाइप टाकून मिलमधील केमिकलयुक्त पाणी रस्त्याच्या उजव्या बाजूला सायगाटा संरक्षित जंगल गट क्र. ८४१ मध्ये सोडण्यात येत आहे. सायगाटामधून पुढे लाखापूर जंगल परिसरात हे दूषित पाणी पोहोचते. या जंगलात वाघ, बिबट यांच्यासह अस्वल, हरीण, रानगवा, चितळ, मोर तथा अनेक वन्यप्राण्यांचा मोठा अधिवास आहे. सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास केव्हाही धोका निर्माण होऊ शकतो. तर त्यांचा अधिवासही धोक्यात आलेला आहे. राखीव किंवा संरक्षित जंगलात सामान्य नागरिकांना प्रवेश करता येत नाही. असे आढळून आल्यास त्यांच्यावर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येते. वन्यजीवांची शिकार झाल्यास कठोर शिक्षेचे प्रावधान आहे; मात्र या सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास व अधिवासाला धोका होण्याची शक्यता आहे.

प्रजननासाठी अनुकूल जंगलब्रह्मपुरी वनविभाग उत्तर-दक्षिण असा ३० हजार हेक्टरमध्ये विस्तीर्ण पसरला आहे. येथील जैवविविधता पोषक असल्याने वाघांसह अनेक वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आढळून येतो. वाघ व बिबट यांच्या प्रजननाकरिता उत्कृष्ट जंगल असल्याने वाघ व बिबट (मादी) यांच्यासह अनेक वन्यप्राणी जंगलात बछड्यांना जन्म देतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या घनदाट जंगलाला संरक्षित घोषित करण्यात येते.

"आर.एफ.ओ. यांना या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी पाठवितो. मिलचे केमिकलयुक्त पाणी जंगलात सोडण्यात येत असेल तर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येईल."- दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी

"नगाभीड महामार्गावरील राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी संरक्षित जंगलात सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे वन्यप्राणी व वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्याकडे मी कारवाईची मागणी करणार आहे."- विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणforestजंगलwildlifeवन्यजीवchandrapur-acचंद्रपूर