नागभीड तालुक्यात काँग्रेसचा वरचष्मा
By Admin | Updated: August 10, 2015 00:44 IST2015-08-10T00:44:24+5:302015-08-10T00:44:24+5:30
घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

नागभीड तालुक्यात काँग्रेसचा वरचष्मा
नागभीड : घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
नागभीड तालुक्यात ६८ ग्रा.पं. च्या निवडणुका झाल्या. यात २७ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे बहुमत आले आहे. १८ ठिकाणी भाजप वरचढ असून २ ठिकाणी काँग्रेस गजब युती बहुमतात आले आहे. असे असले तरी नागभीड आणि तळोधी या तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या दोन मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.
वाढोणा या क्रमांक तीन च्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस- भाजप युतीने आपला झेंडा रोवला आहे. या निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनसुबे प्रफुल्लीत झाले आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मौशी, बाळापूर, वलणी, डोंगरगाव, मोहाळी मोकासा या महत्वपुर्ण ग्रामपंचायतीवर काँग्रेस विजयी झाली असुन पाहार्णी, सुलेझरी, कन्हाळगाव, मिंडाळा या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.
नागभीडमध्ये भाजप
नागभीडमध्ये भाजपने बहुमत प्राप्त केले आहे. येथे भोजपचे ८, काँग्रेसचे ६ तर तीन जागा अपक्षांनी पडकावल्या आहेत. नागभीडमध्ये ज्यांची अपेक्षा होती, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर काहींनी अनपेक्षित विजय प्राप्त केला आहे.
आवारपूर ग्रामपंचायतीवर
काँग्रेसचा झेंडा
आवारपूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर ग्रामपंचायतला निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३ पैकी ११ जागा जिंकत शेतकरी संघटनेची सत्ता संपुष्टात आणली आहे.
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये दर्शन बदरे, विठ्ठल डाहुले, शशिकांत दिवे, मंदा डंभारे, वर्षा सोनटक्के,अविनाश चौधरी, बंडू कवाडे, पद्मारत्न, सिंधू परचाके, राहूल बोढे, शिला धोटे यांचा समावेश आहे.
शेतकरी संघटनेला केवळ २ जागा जिंकता आल्या. विजयी उमेदवारांमध्ये विद्या कुराराम, मंदा ताजने यांचा समावेश आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण
कोरपना येथे काँग्रेस कार्यकर्ते विजयी जल्लोष करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुकी, मारहाण करून आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांवर केला आहे. तसेच चार चाकी वाहनाची हवा सोडून नाहक त्रास दिल्याचासुद्धा आरोप आहे.
कोकेवाडा येथे पती-पत्नी विजयी
भद्रावती : नऊ सदस्यीय कोकेवाडा (तु) ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ९ ही उमेदवार निवडून आलेत. मुख्य म्हणजे याठिकाणी अभय खिरटकर व सुरेखा खिरटकर हे पतीपत्नी निवडून आलेत. यासोबतच संदीप मडावी, गिता श्रीरामे, विमल कुळसंगे, सरिता चौधरी, बालू मंगाम, तारा अगरे, धनराज लोनबले हे उमेदवार निवडून आलेत.या सोबतच पारोधी येथील सात पैकी शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आलेत.
शंकरपुरात वारजुरकर गटाचा झेंडा
शंकरपूर : शंकरपूर येथे पाच वॉर्डात १५ सदस्यांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत वारजुरकर गट्याच्या सुषमा राहूड, दीक्षा भगत, सविता चौधरी, संजय नन्नावरे, लिला गजभे, सुमन सहारे, पिंटू शेरकी, इंदिरा नन्नावरे, रजनी चाचरकर, अशोक चौधरी, सचिन रासेकर, वैशाली सहारे, मनोहर गायकवाड, गोकूल सावरकर, रंजना मेश्राम यांनी निवडणुकीत विजयाची मोहर उमटविली.