शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:39 IST

Chandrapur : मागील हंगामात सोयाबीनवर झाला होता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : मागील काही वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीन बियाणे म्हणून वापर करीत होते. परंतु, मागील हंगामात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग आल्याने यावर्षी शेतात पिकवलेले बियाणे वापरावे की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चांगलीच संभ्रमता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

मागील हंगामात संपूर्ण विदर्भातील सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग आल्याने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेच नाही. ज्या शेतकऱ्यांना थोडेफार सोयाबीन झाले. त्या सोयाबीनला दरही मिळाला नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात सोयाबीन पेरा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही वर्षांपासून बाजारातून विकत घेतलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. जे उगवले त्याची उतारी कमी झाल्याची शेतकऱ्यांची ओरड होती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शेतकरी पेरणी करण्याकरिता घरात ठेवलेल्या सोयाबीनचा वापर अधिक प्रमाणात करत होते. ज्या शेतकऱ्यांजवळ घरचे सोयाबीन नाही ते पेरणी करण्याकरिता दुसऱ्या शेतकऱ्याकडून बियाणे घेत होते.

परंतु, मागील हंगामात जे सोयाबीन निघाले त्याचा दाणाही बुरशीजन्य रोगाने बारीक झाला. मागील हंगामात सोयाबीनला रोगाने पछाडल्याने यावर्षी त्या हंगामात घरी ठेवलेले सोयाबीन वापरणे योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विदर्भाच्या बाहेर मध्य प्रदेश व इतर राज्यातील सोयाबीन पिकावर रोग आला नव्हता. त्यामुळे तिथून येणारे सोयाबीन बियाणे योग्य असल्याचे मानले जात आहे. सोयाबीन पेरणीचे दिवस जवळ आले. त्यामुळे घरचे सोयाबीन पेरणीकरिता वापरावे की विकत सोयाबीन बियाणे घेऊन पेरणी करावी, या संभ्रमात शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळी सोयाबीनची लागवड कमीसोयाबीन बियाणांकरिता शेतकरी उन्हाळी सोयाबीनची लागवड करतात. परंतु, मागच्या हंगामातील अनुभव लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन फार कमी प्रमाणात घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. 

 

मागील हंगामातील सोयाबीन बियाणे म्हणून वापरू नये, उन्हाळ्यात सोयाबीन पीक घेतले असेल तर त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करूनच बियाणे म्हणून वापरावे. - सुशांत लव्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर