शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र साडेतीन महिन्यांनंतर सरपंचाच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST

नागभीड : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिलेल्या निकालास स्थगिती देऊन स्पर्धेत असलेल्या गावांचे फेरमूल्यमापन करण्यात यावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी ...

नागभीड : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिलेल्या निकालास स्थगिती देऊन स्पर्धेत असलेल्या गावांचे फेरमूल्यमापन करण्यात यावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २३ डिसेंबर, २०२०ला लिहिलेले पत्र तक्रारकर्त्या सरपंचांना तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मिळाले आहे.

दरम्यानच्या काळात फेरमूल्यांकनाबाबत काय प्रक्रिया झाल्या, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या संपूर्ण गावांच्या तुलनेत हे गाव तसूभर पुढेच होते. मात्र, राजकीय दबावापोटी दुसऱ्याच गावास पहिल्या क्रमांकाची पसंती देण्यात आली होती. हा कोटगाव या गावावर अन्याय असून, पुन्हा मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी माजी सरपंचासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन केली होती. फेरमूल्यांकन न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला होता.

१९५६ मध्येच आदर्श गावाची पताका फडकावणाऱ्या कोटगावने गेल्या काही वर्षात आदर्श ग्राम योजनेत अनेकदा सहभाग घेतला व पुरस्कारही प्राप्त केले. लोक सहभागाच्या बाबतीत हे गाव नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावात कोणताही सामुदायिक कार्यक्रम असो, या गावाने कधीच पाय मागे घेतले नाही. या वर्षीही जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला आणि या गावात वेगळाच हुरूप निर्माण झाला.

बॉक्स

सर्व अटी केल्या पूर्ण

स्मार्ट ग्रामच्या ज्या काही अटी, नियम आहेत, त्या अटी नियमांची पूर्तता करण्यासाठी या गावाने कंबर कसली आणि लोकसहभागाने कोटगाववासीयांनी अनेक कामे पूर्ण केली.

मूल्यांकनासाठी आलेले अधिकारी गावात आले. गावाची तपासणी केली, पण माहितीपत्रक घेऊन गेले नाही. कागदपत्रांची पूर्तता करा, आपले गुण नक्कीच वाढतील, असा सल्लाही या अधिकाऱ्यांनी दिला. या स्मार्ट ग्राम स्पर्धेचा निकाल आला, तेव्हा गावकऱ्यांना चांगलाच धक्का बसला. कारण निवडीत कोटगावला वगळण्यात आले होते. या अन्यायाविरोधात १० डिसेंबर, २०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

कोट

स्मार्ट ग्राम निवडीत कोटगाववर झालेल्या अन्यायाची तक्रार मी १० डिसेंबर, २०२०ला जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. २३ डिसेंबर, २०२०ला जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंबंधी काही सूचना दिल्याचे पत्रावरून दिसून येते. मात्र, मला या सूचना ९ एप्रिलला प्राप्त झाल्या. स्मार्ट ग्राम फेरमूल्यांकनाबाबत मधल्या काळात काय प्रक्रिया झाल्या, याबाबत मी व गावकरी अनभिज्ञ आहोत.

- यशवंत भेंडारकर, तक्रारकर्ता व विद्यमान उपसरपंच, कोटगाव