शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. 

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कालबाह्य झालेले ३ व ४ क्रमांकाचे संच बंद करण्याचा सूर पर्यावरणवाद्यांमधून घुमत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे पाऊल नव्या वर्षांत चंद्रपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. यासोबतच वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. याची काळजी नव्या महानगरपालिका घेतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. वीज केंद्राने सुमारे २०० कोटी रुपये खर्चून उभारलेला कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभारला. वीज निर्मितीसाठी ट्रकद्वारे येणार कोळसा खाणीतून आता पाईपद्वारे थेट वीज केंद्रात येत आहे. ही मोठी उपलब्धी मानली जाते. 

विरोधापेक्षा सकारात्मक प्रयत्न कामी येतातवीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. त्यांच्याच हातात वीज केंद्राची धुरा आहे. आपल्या कारकीर्दीत चंद्रपूर वीज केंद्रातून होणारे प्रदूषण कमी करणे, हा आपला मुख्य हेतू असल्याचे ते वारंवार सांगतात. याच काळात कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभा राहिला. उद्योग असेल, तर रोजगार येतो. उद्योग नसेल, तर उद्योगाची मागणी होते. आहे तो उद्योग पर्यावरणपूरक पद्धतीने चालविण्यासाठी तेथील जनतेचे सहकार्य गरजेचे असते. ही त्यांची भावना आहे. तोडगा दिला तर नक्कीच मार्ग निघेल, असा त्यांचा विश्वास आहे.

 

टॅग्स :electricityवीज