शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. 

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कालबाह्य झालेले ३ व ४ क्रमांकाचे संच बंद करण्याचा सूर पर्यावरणवाद्यांमधून घुमत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे पाऊल नव्या वर्षांत चंद्रपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. यासोबतच वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. याची काळजी नव्या महानगरपालिका घेतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. वीज केंद्राने सुमारे २०० कोटी रुपये खर्चून उभारलेला कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभारला. वीज निर्मितीसाठी ट्रकद्वारे येणार कोळसा खाणीतून आता पाईपद्वारे थेट वीज केंद्रात येत आहे. ही मोठी उपलब्धी मानली जाते. 

विरोधापेक्षा सकारात्मक प्रयत्न कामी येतातवीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. त्यांच्याच हातात वीज केंद्राची धुरा आहे. आपल्या कारकीर्दीत चंद्रपूर वीज केंद्रातून होणारे प्रदूषण कमी करणे, हा आपला मुख्य हेतू असल्याचे ते वारंवार सांगतात. याच काळात कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभा राहिला. उद्योग असेल, तर रोजगार येतो. उद्योग नसेल, तर उद्योगाची मागणी होते. आहे तो उद्योग पर्यावरणपूरक पद्धतीने चालविण्यासाठी तेथील जनतेचे सहकार्य गरजेचे असते. ही त्यांची भावना आहे. तोडगा दिला तर नक्कीच मार्ग निघेल, असा त्यांचा विश्वास आहे.

 

टॅग्स :electricityवीज