शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. 

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कालबाह्य झालेले ३ व ४ क्रमांकाचे संच बंद करण्याचा सूर पर्यावरणवाद्यांमधून घुमत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे पाऊल नव्या वर्षांत चंद्रपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. यासोबतच वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. याची काळजी नव्या महानगरपालिका घेतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. वीज केंद्राने सुमारे २०० कोटी रुपये खर्चून उभारलेला कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभारला. वीज निर्मितीसाठी ट्रकद्वारे येणार कोळसा खाणीतून आता पाईपद्वारे थेट वीज केंद्रात येत आहे. ही मोठी उपलब्धी मानली जाते. 

विरोधापेक्षा सकारात्मक प्रयत्न कामी येतातवीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. त्यांच्याच हातात वीज केंद्राची धुरा आहे. आपल्या कारकीर्दीत चंद्रपूर वीज केंद्रातून होणारे प्रदूषण कमी करणे, हा आपला मुख्य हेतू असल्याचे ते वारंवार सांगतात. याच काळात कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभा राहिला. उद्योग असेल, तर रोजगार येतो. उद्योग नसेल, तर उद्योगाची मागणी होते. आहे तो उद्योग पर्यावरणपूरक पद्धतीने चालविण्यासाठी तेथील जनतेचे सहकार्य गरजेचे असते. ही त्यांची भावना आहे. तोडगा दिला तर नक्कीच मार्ग निघेल, असा त्यांचा विश्वास आहे.

 

टॅग्स :electricityवीज