शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होताे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचाही परिणाम अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना होताे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या, आरोग्याला जपा, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

पावसाच्या दिवसामध्ये विविध आजार तोंड बाहेर काढतात. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते. विशेषत: या दिवसामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे वातावरणात सारखा बदल झालेला दिसतो. या काळात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. काहींना दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्येदेखील आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: प्रतीकारशक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. दमा आजार असलेल्या रुग्णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास या आजारापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.

बाॅक्स

ही घ्या काळजी

दमा असलेल्या रुग्णांनी थंड वातावरणात जाऊ नये, आंबट पदार्थ खाणे टाळावे, डाॅक्टरांनी दिलेले औषध नियमित घ्यावे, तसेच सोबत बाळगावे. ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. संसर्ग होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.

बाॅक्स

बालकांनाही अस्थमा

बालकांना सर्दी-खोकला होताे. मग दम लागते. अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे. त्रास जाणवत असला तर बालक अस्वस्थ असतात. अशावेळी त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना अस्थमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

बाॅक्स

प्रतिकारशक्ती कमी

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना अस्थमा तसेच इतर आजाराची लागत अधिक लवकर होते. आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, हे जाणून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार सर्दी किंवा थंडी वाटत असेल तर कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे या दिवसांमध्ये अस्थमा रुग्णसंख्या वाढते.

ज्यांना त्रास आहे त्यांनी वेळीच डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. थंड, आंबड पदार्थ खाण्याचे कटाक्षाने टाळावे. दम्याच्या रुग्णांनी आपली औषधे कायम सोबत ठेवावी.-डाॅ. सौरभ राजुरकर

छातीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर.