शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होताे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचाही परिणाम अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना होताे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या, आरोग्याला जपा, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

पावसाच्या दिवसामध्ये विविध आजार तोंड बाहेर काढतात. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते. विशेषत: या दिवसामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे वातावरणात सारखा बदल झालेला दिसतो. या काळात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. काहींना दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्येदेखील आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: प्रतीकारशक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. दमा आजार असलेल्या रुग्णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास या आजारापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.

बाॅक्स

ही घ्या काळजी

दमा असलेल्या रुग्णांनी थंड वातावरणात जाऊ नये, आंबट पदार्थ खाणे टाळावे, डाॅक्टरांनी दिलेले औषध नियमित घ्यावे, तसेच सोबत बाळगावे. ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. संसर्ग होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.

बाॅक्स

बालकांनाही अस्थमा

बालकांना सर्दी-खोकला होताे. मग दम लागते. अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे. त्रास जाणवत असला तर बालक अस्वस्थ असतात. अशावेळी त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना अस्थमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

बाॅक्स

प्रतिकारशक्ती कमी

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना अस्थमा तसेच इतर आजाराची लागत अधिक लवकर होते. आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, हे जाणून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार सर्दी किंवा थंडी वाटत असेल तर कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे या दिवसांमध्ये अस्थमा रुग्णसंख्या वाढते.

ज्यांना त्रास आहे त्यांनी वेळीच डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. थंड, आंबड पदार्थ खाण्याचे कटाक्षाने टाळावे. दम्याच्या रुग्णांनी आपली औषधे कायम सोबत ठेवावी.-डाॅ. सौरभ राजुरकर

छातीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर.