शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होताे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचाही परिणाम अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना होताे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या, आरोग्याला जपा, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

पावसाच्या दिवसामध्ये विविध आजार तोंड बाहेर काढतात. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते. विशेषत: या दिवसामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे वातावरणात सारखा बदल झालेला दिसतो. या काळात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. काहींना दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्येदेखील आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: प्रतीकारशक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. दमा आजार असलेल्या रुग्णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास या आजारापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.

बाॅक्स

ही घ्या काळजी

दमा असलेल्या रुग्णांनी थंड वातावरणात जाऊ नये, आंबट पदार्थ खाणे टाळावे, डाॅक्टरांनी दिलेले औषध नियमित घ्यावे, तसेच सोबत बाळगावे. ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. संसर्ग होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.

बाॅक्स

बालकांनाही अस्थमा

बालकांना सर्दी-खोकला होताे. मग दम लागते. अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे. त्रास जाणवत असला तर बालक अस्वस्थ असतात. अशावेळी त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना अस्थमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

बाॅक्स

प्रतिकारशक्ती कमी

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना अस्थमा तसेच इतर आजाराची लागत अधिक लवकर होते. आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, हे जाणून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार सर्दी किंवा थंडी वाटत असेल तर कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे या दिवसांमध्ये अस्थमा रुग्णसंख्या वाढते.

ज्यांना त्रास आहे त्यांनी वेळीच डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. थंड, आंबड पदार्थ खाण्याचे कटाक्षाने टाळावे. दम्याच्या रुग्णांनी आपली औषधे कायम सोबत ठेवावी.-डाॅ. सौरभ राजुरकर

छातीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर.