शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रविवारपासून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी कोणत्याही रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसून गुरुवारपर्यंत असणाº्या ४५ विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आठ नागरिकांचे होमकॉरेन्टाईन संपुष्टात आले.

ठळक मुद्दे‘गो कोरोना’साठी प्रशासन गंभीर : आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन आता सक्तीने अनेक क्षेत्रात कार्यवाही करीत आहे. शुक्रवारपासून १४४ कलम जिल्ह्यात लागली असून शनिवारी रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचा कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी सर्वांनी घराबाहेर पडूच नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी कोणत्याही रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसून गुरुवारपर्यंत असणाº्या ४५ विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आठ नागरिकांचे होमकॉरेन्टाईन संपुष्टात आले.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज स्वत: रेल्वे स्थानकाची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी ऑटो चालकांची संवाद साधला. त्यांना मास्क वाटप केले. या कठीण परिस्थितीत ग्राहकांची सेवा करीत असल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना स्वच्छता राखून प्रशासनाला माहिती पुरविण्याचेही त्यांनी ऑटो चालकांना सांगितले.दरम्यान, गेल्या काही दिवसात ११ ते ६ पर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होती. उद्या शनिवारपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू राहतील. मात्र रविवार सकाळपासून पुढील आदेश येईपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाने आज दिले आहेत.पुणे, मुंबई व अन्य भागातून येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी घाबरून न जाता या काळामध्ये घरीच अलिप्त राहणे योग्य ठरेल. सामान्य नागरिकांना आपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील ०७१७२-२७०६६९, जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये ०७१७२-२६१२२६ व चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जीवनावश्यक वस्तू सर्वांना मिळणारयाकाळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणाºया दुकानांना मात्र नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिकचा साठा करण्याची घाई करू नये. सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, अशा पद्धतीने सर्व किराणा दुकान, दूध केंद्र, पेट्रोल पंप व अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे केंद्र सुरू राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनीस्पष्ट केले आहे.हॉटेल्समधून जेवण मिळणार पार्सलशहरांमध्ये रस्त्याच्या कडेला असणारे व रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये खाद्य तयार करणाºया संस्था बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणावरून केवळ पार्सल सुविधा किंवा होम डिलेवरी करता येईल. याठिकाणी ग्राहकांना जेवण देता येणार नाही. असे आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल.पालकमंत्र्यांनी घेतला आढावादरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व अन्य वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात जमावबंदी लागू केल्यानंतर सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने पुढील काही दिवस अतिशय कठोरपणे ही मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये तथापि, या काळामध्ये नागरिकांनी घरीच राहणे सोयीचे राहील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनो, घाबरू नका - डॉ. निवृत्ती राठोडचंद्रपूर : पुण्याहून विशेष रेल्वे गाडीने दोन दिवसांपूर्वी सुमारे ८०० विद्यार्थी पुण्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी पोहचले आहे. या विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र यातील अनेक विद्यार्थी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत पाडली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घाबरण्याचे काहीएक कारण नसल्याचे म्हटले आहे. या विद्यार्थ्यांना पुढील १४ दिवस घरीच सुरक्षित राहायचे आहे. त्यांनी सोबत आणलेल्या वस्तू देखील वेगळ्या ठेवायच्या आहे. या विद्यार्थ्यांनी बाहेर फिरू नये, कुणाच्याही संपर्कात येऊ नये, असेही यावेळी डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले.

कोरोना अपडेटरविवारचा जनतेचा कर्फ्यू पाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेशचंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाहीनवीन कोणत्याही रुग्णाची जिल्ह्यामध्ये नोंद नाहीपालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाविदेशातून आलेले ३७ नागरिक अजूनही होम कॉरेनटाइनलग्नसमारंभाच्या आयोजनावर पूर्णपणे बंदीफक्त शनिवारी ११ ते ६ दुकाने उघडी राहतीलरेस्टॉरंट हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा व होम डिलिव्हरीला परवानगीएमआयडीसी व अन्य ठिकाणच्या उद्योगांना बंद ठेवण्याचे आदेशजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उद्योग सुरू राहतीलनागरिकांना नियमित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईलजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने नियमितपणे उघडे राहतील

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार