‘मन की बात’ला नागरिकांचा प्रतिसाद
By Admin | Updated: April 26, 2016 00:41 IST2016-04-26T00:41:44+5:302016-04-26T00:41:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

‘मन की बात’ला नागरिकांचा प्रतिसाद
वरोरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा कार्यक्रम बघण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर ग्रामस्थांसोबत आनंदवन ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित होते. ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पाहता किंवा ऐकता यावा, याकरिता ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम बघण्याकरिता नागरिक दुपारी ३ वाजता उपस्थित झाले. हा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांसोबत बघितला. त्यानंतर आनंदवन ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती वर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील नागरकांना मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व स्वच्छता तसेच पाण्याचे महत्त्व विषद केले.
ना.हंसराज अहीर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून हा कार्यक्रम ग्रामस्थांसोबत बघितला. या कार्यक्रमाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्स्कुता दिसून आली. या कार्यक्रमामुळे पंचायत राज नितीला चालना मिळणार असल्याचे मत याप्रसंगी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
यावेळी आनंदवन ग्रामपंचायतीचे सरपंच काशिनाथ मेश्राम, माजी सरपंच राजु सावसाकडे, भाजपा तालुका संघटक ओम मांडवकर, रवी नागपुरे, रविंद्र कष्टी, आनंदवन ग्रामपंचायतीचे सदस्य तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच तहसीलदार राजेश मांडवकर, सवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, विस्तार अधिकारी एन.ए. नागतोडे, आस्कर, खुजे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)