विजेचा लपंडावाने पोंभूर्णा तालुक्यातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:21+5:30
पोंभूर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर देवाडा खुर्द हे गाव आहे. या परिसरामध्ये थेरगाव, जामतुकूम, जामखुर्द, जाम रैय्यतवारी यासह अनेक लहान मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. गेल्यादोन महिन्यापासून सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने याचा परिणाम पाणी पुरवठा योजनेवरही होत आहे. दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

विजेचा लपंडावाने पोंभूर्णा तालुक्यातील नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : मागील दोन महिन्यांपासून देवाडा खुर्द व परिसरामध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावरही विपरीत परिणाम पडला आहे. वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोंभूर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर देवाडा खुर्द हे गाव आहे. या परिसरामध्ये थेरगाव, जामतुकूम, जामखुर्द, जाम रैय्यतवारी यासह अनेक लहान मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. गेल्यादोन महिन्यापासून सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने याचा परिणाम पाणी पुरवठा योजनेवरही होत आहे. दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा असताना सुद्धा नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान वीज पुरवठा सुरळीत न केल्यास नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहे.
ऑनलाईन व बँक व्यवहारांवर परिणाम
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कार्यालय, बँका तसेच अन्य ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. ऑनलाईन कामे करीत असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने कामावर परिणाम होत आहे. तसेच बँकेतील व्यवहार करताना अडचण येत आहे.
पावसामुळे इन्शुलेटर पंचर होतात आणि सदर पंचर बारिक असतात. त्यामुळे फाल्ट शोधणे फार कठीण जाते. अशातच दुरुस्ती करण्यास बराच वेळ लागतो. यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला असून लवकरच सुधारणा केली जाईल.
- प्रमोद गुमदेलवार
उपकार्यकारी अभियंता
वीज वितरण कंपनी, पोंभूर्णा
मागील दोन महिन्यांपासून परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे याचा परिणाम घरगुती उपकरणावर व पाणी पुरवठ्यावर होत आहे.
- विठ्ठल भडके,
ग्राहक, देवाडा खुर्द