शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

परराज्यातील नागरिकांनाही मिळणार रेशन दुकानातून धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देपोर्टबिलिटी। एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जागोजागी नागरिक अडकले आहे. या नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.केंद्र शासनाने ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ या योजनेंतर्गत काही राज्यांसोबत आंतरराज्य पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, राज्यस्थान, उत्तरप्रदेश व बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे या नागरिकांनाही चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलता येणार आहे. यासाठी त्यांच्याजवळ त्या राज्यातील रेशनकाडवर नाव असने गरजेचे आहे.असे होणार अन्नधान्य वितरणजिल्ह्यामध्ये मे २०२० मध्ये योजना निहाय अन्नधान्य वाटप परिमाण ठरलेले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड २ रुपये प्रती किलो दराने गहू १५ किलो, ३ रुपये प्रति किलो दराने तांदूळ २० किलो तर २० रुपये प्रति किलो दराने एक किलो साखर मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ रुपये प्रति किलो दराने गहू ३ किलो, २ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ मिळणार आहे.कार्ड नसलेल्यांना रहावे लागणार वचिंतकार्डधारकांनी दुकानात धान्य घेताना सामाजिक अंतर तसेच मास्क घालणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनी चौकशी करण्याकरिता रास्तभाव दुकानात जाऊन त्रास देवून नये, त्यांना काही चौकशी करायची असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाकडे किंवा प्रसिध्द केलेल्या हेल्पलाईन क्रमाकांवर सपंर्क साधावा. रेशनकार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदारांना धान्याची मागणी करु नये किंवा त्यांच्यावर दबाव आणू नये.- राजेंद्र मिस्किन,जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूरआधार लिंकिंग आवश्यकजिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच, सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतच दुकाने उघडे ठेवावे लागणार आहे. केंद्र शासनाचे सुचनेनुसार मे-२०२० महिन्यात धान्य वाटप करताना ईपॉस मशिनवर प्रत्यक्ष कार्डधारक लाभार्थ्याचा अंगठा लावायचा आहे. त्यानुसार ज्यांचे नाव रेशनकार्डवर आहे व आधार क्रमांक नोंदवलेला आहे अशाच व्यक्तींना धान्य मिळणार आहे. दुकानदारांनी धान्य घेण्यास येणाºया प्रत्येक लाभार्थ्यांकरिता हात धुण्याकरिता साबण व पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.प्राधान्य कुटुंबांनाही धान्यअंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनेच्या रेशन कार्ड धारकांना प्रति माणसी ५ किलो तांदूळ मोफत म्हणजेच, एका कार्डवर ४ व्यक्ती असतील तर त्यांना २० किलो तांदुळ मोफत मिळणार आहे. मे -२०२० महिन्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशनकार्डवर १ किलो डाळ (चणाडाळ/तुरडाळ) यापैकी जी उपलब्ध असेल ती मोफत मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमित धान्य विकत घ्यावे लागणार आहे. धान्य घेतल्यानंतर त्यांना १ किलो डाळ व तांदुळ मानसी ५ किलो प्रमाणे मोफत मिळणार आहे. केशरी कार्ड धारकांना मे महिन्यात प्रति मानसी ३ किलो गहु ८ रुपये प्रति किलो व २ किलो तांदुळ १२ रुपये प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे, त्याच दुकानातून मिळणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक