शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तुम्ही आवडीने खाताय 'तो' च्यवनप्राश अस्सल की बनावट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:52 IST

Chandrapur : च्यवनप्राशमध्ये असावे ५२ औषधी वनस्पतींचे मिश्रण

परिमल डोहणे चंद्रपूर : रोगी राहण्यासाठी बरेचदा आयुर्वेदिक तरल च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. मात्र आजकाल अधिक नफा कमवण्याच्या नादात भेसळयुक्त च्यवनप्राश बाजारात विक्रीस आहेत. असे च्यवनप्राश खाल्ल्यास आरोग्याला कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे अस्सल च्यवनप्राश सकाळी वा साध्यवेळेला खाण्यास पसंती द्यावी, असा सल्ला आयुर्वेदाचार्य डॉ. माधुरी धानोरकर यांनी दिला आहे.

असे ओळखा अस्सल च्यवनप्राशच्यवनप्राश अस्सल आहे की नकली हे ओळखण्यासाठी त्याची चव चाखा. जर च्यवनप्राश साखरेसारखा चवीला गोड लागत असेल, तर त्यात साखर मिसळली असावी. त्यामुळे च्यवनप्राश खरेदी करताना त्याची चव चाखूनच खरेदी करावी. च्यवनप्राश हा देशी तूप आणि गुळापासून बनवला जातो. देशी तूप आणि गुळ हे दुधात अथवा पाण्यात विरघळत नाही ते दुधावर तरंगतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरातील च्यवनप्राश पाण्यात किंवा दुधात विरघळला तर तो बनावट आहे.

फायबर, प्रोटीन अन् व्हिटॅमिनचा भरणाच्यवनप्राशमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बहुगुणी आवळा. आवळा व्हिटॅमिन सीचे भांडार आहे. तसेच अँटीऑक्सिडंट आहे. प्रोटीन, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आदींनी परिपूर्ण असतो.

च्यवनप्राशमध्ये ५२ औषधी वनस्पतींचे मिश्रणअस्सल च्यवनप्राश ५२ हून अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केला जातो. ज्यामध्ये आवळा, अश्वगंधा, विदारीकंद, सफेद मुसळी, शतावरी, अर्जुन, मंगीळा, ब्राह्मी, बला, मुलेढी, वासा, पुनर्नवा, जिवंती, कष्टकारी, हिरडा, गुरूची, दशमूळ, गायीचे तूप, शहद, गूळ या सगळ्या गोष्टी ग्राऊंड करून वापरल्या जातात. त्यानंतर विलायची, पिंपळी वंशलोचन, तमालपत्र, सुंठ, केशर आदी द्रव्ये मिक्स केली जातात.

च्यवनप्राश म्हणजे काय?आयुर्वेद शास्त्रात चवनऋर्षीनी वार्धक्यावस्था दूर ठेवून तारुण्यावस्था प्राप्त करण्यासाठी एक रसायन औषधीचे सेवन केले व त्यांना तारुण्यावस्था प्राप्त झाली. तेव्हापासून 'त्या' रसायन औषधीचे नामकरण 'च्यवनप्राश' असे झाले, असे वर्णन आयुर्वेद शास्त्रात करण्यात आले आहे.

"च्यवनप्राशला रसायन औषधी म्हटले जाते. रसायन म्हणजेच जे शरीराला निरोगी, आरोग्यसंपन्न करते. तसेच वृद्धावस्था लवकर येऊ देत नाही. रोगप्रतिकारशक्ती शरीरबल, तेज, वाढवते. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशक्तपणा, जीर्ण, सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, क्षयरोग आहे. त्यांनी इतर औषधांसह सकाळी एक ते दोन चमचे च्यवनप्राशचे सेवन करावे."- डॉ. माधुरी धानोरकर, आयुर्वेदाचार्य, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स