शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

जमिनीच्या पोतानुसार कापूस बियाणे निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे कापूस लागवड क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्याचे त्यामध्ये नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कसे आहे. हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कापूस पिकाची जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड, मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी. जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्यांची निवड केली पाहिजे.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पादन व पिकाची कमी वाढ या दोन समस्यांनी ग्रस्त असते. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाण्यांचे नवीन जाती विकसित केल्या पाहिजे.कोरडवाहु कापसापासुन उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरडवाहु भागासाठी कमी पाण्यात पीक येऊ शकेल, अशाच वाणांची लागवड करावी. वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणेकरून चांगला पाऊस राहील. त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्वता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रणकोरडवाहु वाण लागवड करण्यापूर्वी शेतातील नेहमी उगविणाऱ्या तणांचे निरीक्षण करावे. रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरून सुरूवातीच्या काळातच तण नियंत्रण करावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी पूर्णत: पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतात. एखाद्या वेळेला पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण करता येत नाही. कापूस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपूर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.रासायनिक खतांचे प्रमाणकापूस पिकाला रासायनिक खते देताना स्फुरद व पालाश खताची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळेला द्यावी. रोप उगवणीनंतर पिकाला नत्र युक्त खतांची अर्धी मात्रा दिल्यास पीक चांगले वाढेल. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घ्यावी. लागवडीप्रसंगी नत्र युक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत जमिनीत एकत्र करून टाकावी.वढा येथे जागृती शिबिरकृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कापूस लागवड तंत्रज्ञान व अनधिकृत कापूस बियाणे टाळण्यासाठी मार्गदर्शन शिबिर गुरूवारी वढा येथे शिबिर पार पडले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाचे महत्त्व पटवून दिले.पोलीस निरीक्षक आमले यांनी बोगस कापूस बियाणे विकत घेणे, शेतात लावणे व विक्री करण्यास मदत करणे हा गुन्हा आहे. अशा घटना घडल्यास आल्यास पोलीस विभागाला सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस