शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जमिनीच्या पोतानुसार कापूस बियाणे निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे कापूस लागवड क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्याचे त्यामध्ये नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कसे आहे. हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कापूस पिकाची जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड, मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी. जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्यांची निवड केली पाहिजे.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पादन व पिकाची कमी वाढ या दोन समस्यांनी ग्रस्त असते. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाण्यांचे नवीन जाती विकसित केल्या पाहिजे.कोरडवाहु कापसापासुन उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरडवाहु भागासाठी कमी पाण्यात पीक येऊ शकेल, अशाच वाणांची लागवड करावी. वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणेकरून चांगला पाऊस राहील. त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्वता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रणकोरडवाहु वाण लागवड करण्यापूर्वी शेतातील नेहमी उगविणाऱ्या तणांचे निरीक्षण करावे. रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरून सुरूवातीच्या काळातच तण नियंत्रण करावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी पूर्णत: पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतात. एखाद्या वेळेला पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण करता येत नाही. कापूस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपूर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.रासायनिक खतांचे प्रमाणकापूस पिकाला रासायनिक खते देताना स्फुरद व पालाश खताची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळेला द्यावी. रोप उगवणीनंतर पिकाला नत्र युक्त खतांची अर्धी मात्रा दिल्यास पीक चांगले वाढेल. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घ्यावी. लागवडीप्रसंगी नत्र युक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत जमिनीत एकत्र करून टाकावी.वढा येथे जागृती शिबिरकृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कापूस लागवड तंत्रज्ञान व अनधिकृत कापूस बियाणे टाळण्यासाठी मार्गदर्शन शिबिर गुरूवारी वढा येथे शिबिर पार पडले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाचे महत्त्व पटवून दिले.पोलीस निरीक्षक आमले यांनी बोगस कापूस बियाणे विकत घेणे, शेतात लावणे व विक्री करण्यास मदत करणे हा गुन्हा आहे. अशा घटना घडल्यास आल्यास पोलीस विभागाला सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस