शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

जमिनीच्या पोतानुसार कापूस बियाणे निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे कापूस लागवड क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्याचे त्यामध्ये नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कसे आहे. हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कापूस पिकाची जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड, मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी. जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्यांची निवड केली पाहिजे.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पादन व पिकाची कमी वाढ या दोन समस्यांनी ग्रस्त असते. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाण्यांचे नवीन जाती विकसित केल्या पाहिजे.कोरडवाहु कापसापासुन उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरडवाहु भागासाठी कमी पाण्यात पीक येऊ शकेल, अशाच वाणांची लागवड करावी. वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणेकरून चांगला पाऊस राहील. त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्वता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रणकोरडवाहु वाण लागवड करण्यापूर्वी शेतातील नेहमी उगविणाऱ्या तणांचे निरीक्षण करावे. रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरून सुरूवातीच्या काळातच तण नियंत्रण करावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी पूर्णत: पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतात. एखाद्या वेळेला पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण करता येत नाही. कापूस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपूर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.रासायनिक खतांचे प्रमाणकापूस पिकाला रासायनिक खते देताना स्फुरद व पालाश खताची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळेला द्यावी. रोप उगवणीनंतर पिकाला नत्र युक्त खतांची अर्धी मात्रा दिल्यास पीक चांगले वाढेल. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घ्यावी. लागवडीप्रसंगी नत्र युक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत जमिनीत एकत्र करून टाकावी.वढा येथे जागृती शिबिरकृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कापूस लागवड तंत्रज्ञान व अनधिकृत कापूस बियाणे टाळण्यासाठी मार्गदर्शन शिबिर गुरूवारी वढा येथे शिबिर पार पडले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाचे महत्त्व पटवून दिले.पोलीस निरीक्षक आमले यांनी बोगस कापूस बियाणे विकत घेणे, शेतात लावणे व विक्री करण्यास मदत करणे हा गुन्हा आहे. अशा घटना घडल्यास आल्यास पोलीस विभागाला सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस