शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

जमिनीच्या पोतानुसार कापूस बियाणे निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे कापूस लागवड क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्याचे त्यामध्ये नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कसे आहे. हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कापूस पिकाची जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड, मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी. जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्यांची निवड केली पाहिजे.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पादन व पिकाची कमी वाढ या दोन समस्यांनी ग्रस्त असते. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाण्यांचे नवीन जाती विकसित केल्या पाहिजे.कोरडवाहु कापसापासुन उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरडवाहु भागासाठी कमी पाण्यात पीक येऊ शकेल, अशाच वाणांची लागवड करावी. वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणेकरून चांगला पाऊस राहील. त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्वता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रणकोरडवाहु वाण लागवड करण्यापूर्वी शेतातील नेहमी उगविणाऱ्या तणांचे निरीक्षण करावे. रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरून सुरूवातीच्या काळातच तण नियंत्रण करावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी पूर्णत: पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतात. एखाद्या वेळेला पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण करता येत नाही. कापूस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपूर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.रासायनिक खतांचे प्रमाणकापूस पिकाला रासायनिक खते देताना स्फुरद व पालाश खताची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळेला द्यावी. रोप उगवणीनंतर पिकाला नत्र युक्त खतांची अर्धी मात्रा दिल्यास पीक चांगले वाढेल. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घ्यावी. लागवडीप्रसंगी नत्र युक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत जमिनीत एकत्र करून टाकावी.वढा येथे जागृती शिबिरकृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कापूस लागवड तंत्रज्ञान व अनधिकृत कापूस बियाणे टाळण्यासाठी मार्गदर्शन शिबिर गुरूवारी वढा येथे शिबिर पार पडले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाचे महत्त्व पटवून दिले.पोलीस निरीक्षक आमले यांनी बोगस कापूस बियाणे विकत घेणे, शेतात लावणे व विक्री करण्यास मदत करणे हा गुन्हा आहे. अशा घटना घडल्यास आल्यास पोलीस विभागाला सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस