शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मिरची सात हजारांनी घसरली; शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:50 IST

Chandrapur : २८० हेक्टर क्षेत्रात यंदा मिरची लागवड झाली होती.

सतीश जमदाडे लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : कोरपना तालुक्यात यंदा ८२० हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड झाली. उत्पादनही चांगले झाले. २०२३ मध्ये २३ ते २५ हजार रुपये, २०२४ मध्ये १५ ते १७ हजार रुपये भाव होता. यंदा २०२५ मध्ये केवळ ७ते १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. लागवडीचा खर्च देखील निघेल की नाही, या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कापूस उत्पादक तालुका म्हणून परिचित असला तरी शेतकरी विविध पिके घेत आहेत. मिरची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु दोन वर्षांच्या तुलनेत यंदा भाव कमालीचा घसरला. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात अल्प दरात विक्री करीत आहे. मिरची उत्पादन घ्यायला खर्च बराच येतो. 

शेतकरी कर्जाच्या खाईतमिरची लागवडीत आंतरमशागत खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये तण काढणे, खत देणे व मुळांभोवती माती चांगली करणे यांचा समावेश होतो. सुरुवातीला दर १५ दिवसांनी तण काढून खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. एवढा खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते; पण मिरचीला मिळत असलेला दर समाधानकारक नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

"मिरचीला खर्च अधिक लागतो. त्यामुळे लहान शेतकरी याकडे वळत नाही. यावर्षी भाव कमी असल्याने पीक घ्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे. शासनाने किमान १७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तरच दिलासा मिळेल."- बापुराव सिदारेड्डी, शेतकरी, राजुरगुडा

"पाच एकरात मिरची लागवड केली; पण यंदा भाव कमी असल्याने मिरची शेती करणे परवडण्यासारखी स्थिती नाही. पिकविलेल्या मिरचीचे करायचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भाववाढ करावी."- अविनाश काठे, शेतकरी नांदा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेती