शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मिरची सात हजारांनी घसरली; शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:50 IST

Chandrapur : २८० हेक्टर क्षेत्रात यंदा मिरची लागवड झाली होती.

सतीश जमदाडे लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : कोरपना तालुक्यात यंदा ८२० हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड झाली. उत्पादनही चांगले झाले. २०२३ मध्ये २३ ते २५ हजार रुपये, २०२४ मध्ये १५ ते १७ हजार रुपये भाव होता. यंदा २०२५ मध्ये केवळ ७ते १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. लागवडीचा खर्च देखील निघेल की नाही, या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कापूस उत्पादक तालुका म्हणून परिचित असला तरी शेतकरी विविध पिके घेत आहेत. मिरची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु दोन वर्षांच्या तुलनेत यंदा भाव कमालीचा घसरला. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात अल्प दरात विक्री करीत आहे. मिरची उत्पादन घ्यायला खर्च बराच येतो. 

शेतकरी कर्जाच्या खाईतमिरची लागवडीत आंतरमशागत खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये तण काढणे, खत देणे व मुळांभोवती माती चांगली करणे यांचा समावेश होतो. सुरुवातीला दर १५ दिवसांनी तण काढून खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. एवढा खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते; पण मिरचीला मिळत असलेला दर समाधानकारक नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

"मिरचीला खर्च अधिक लागतो. त्यामुळे लहान शेतकरी याकडे वळत नाही. यावर्षी भाव कमी असल्याने पीक घ्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे. शासनाने किमान १७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तरच दिलासा मिळेल."- बापुराव सिदारेड्डी, शेतकरी, राजुरगुडा

"पाच एकरात मिरची लागवड केली; पण यंदा भाव कमी असल्याने मिरची शेती करणे परवडण्यासारखी स्थिती नाही. पिकविलेल्या मिरचीचे करायचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भाववाढ करावी."- अविनाश काठे, शेतकरी नांदा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेती