शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मिरची सात हजारांनी घसरली; शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:50 IST

Chandrapur : २८० हेक्टर क्षेत्रात यंदा मिरची लागवड झाली होती.

सतीश जमदाडे लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : कोरपना तालुक्यात यंदा ८२० हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड झाली. उत्पादनही चांगले झाले. २०२३ मध्ये २३ ते २५ हजार रुपये, २०२४ मध्ये १५ ते १७ हजार रुपये भाव होता. यंदा २०२५ मध्ये केवळ ७ते १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. लागवडीचा खर्च देखील निघेल की नाही, या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कापूस उत्पादक तालुका म्हणून परिचित असला तरी शेतकरी विविध पिके घेत आहेत. मिरची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु दोन वर्षांच्या तुलनेत यंदा भाव कमालीचा घसरला. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात अल्प दरात विक्री करीत आहे. मिरची उत्पादन घ्यायला खर्च बराच येतो. 

शेतकरी कर्जाच्या खाईतमिरची लागवडीत आंतरमशागत खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये तण काढणे, खत देणे व मुळांभोवती माती चांगली करणे यांचा समावेश होतो. सुरुवातीला दर १५ दिवसांनी तण काढून खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. एवढा खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते; पण मिरचीला मिळत असलेला दर समाधानकारक नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

"मिरचीला खर्च अधिक लागतो. त्यामुळे लहान शेतकरी याकडे वळत नाही. यावर्षी भाव कमी असल्याने पीक घ्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे. शासनाने किमान १७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तरच दिलासा मिळेल."- बापुराव सिदारेड्डी, शेतकरी, राजुरगुडा

"पाच एकरात मिरची लागवड केली; पण यंदा भाव कमी असल्याने मिरची शेती करणे परवडण्यासारखी स्थिती नाही. पिकविलेल्या मिरचीचे करायचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भाववाढ करावी."- अविनाश काठे, शेतकरी नांदा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेती