रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:01:09+5:30
जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, जस्ताचे प्रमाण तपासले जातात.

रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता ढासळली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेत जमिनीची खोली, मातीच्या कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण, सुक्ष्म जिवाणूंची संख्या आदींवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते. जमिनीचा पोत व जडण-घडण यावरच जमिनीचा पोत अवलंबून असते. मात्र उत्पादनासाठी रासायानिक खतांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर तसेच सेंद्रीय खतांची कमतरता यामुळे जमिनीचा ºहास होत आहे. परिणामी जिल्ह्यातील जमिनीची सुपिकता दरवर्षी ढासळत आहे.
जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, जस्ताचे प्रमाण तपासले जातात. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मृदा तपासणी न करताच पेरणी करतात. परिणामी अनेकवेळा नुकसानीला जामोरे जावे लागते.
दरवर्षी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मृदा तपासणी करण्याचे आवाहन केले जाते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माती परिक्षणासाठी अत्यल्प नमूने प्रयोगशाळेत आले आहे. जमीन ही एक सजीव संस्था आहे. यात अनेक सुक्ष्म जीवजंतू (जीवाणू, बुरशी व इतर सुक्ष्म सजीव घटक) व प्राणी (गांडुळ) यांचा अधिवास असतोे. जमिनीस जैविक गुणधर्म प्राप्त होतात. तर जमिनीत असलेल्या खनिजामुळे व भौगोलिक घटकांमुळे जमिनीला भौतिक व रासायनिक गुणधर्म (जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण) प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकवर्षी शेतकºयांनी माती परिक्षण करून त्यानुसार द्रव्याचे प्रमाण कमी-अधिक करून पेरणी केल्यास उत्पादनात निश्चितच भर पडेल, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यावर्षी खरीप हंगाम कोरोनाच्या संकटात अडकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी परीक्षण न करताच पेरणी आटोपली.
उत्पादनात वाढ होण्यासाठी नैसर्गिक घटक आवश्यक
मृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रीय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा हे घटक असतात. या घटकांचे प्रमाण योग्य राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ व सातत्य राखण्यास शक्य होणार आहे.मृदा तयार होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
संतुलित खतांचे वापर
असंतुलित खत वापराने जमिनीचे आरोग्य बिघडत असून अशा जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात करणे आवश्यक आहे. उत्पादन वाढीसाठी संकरित व अधिक उत्पादनक्षम जातींच्या बियाणांचा वापर वाढला आहे.
जमिनीच्या आरोग्याची गुरूकिल्ली सामू
जमिनीचा सामू सात असल्यास जमीन उदासीन प्रकारात मोडते. सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी व सातपेक्षा जास्त असल्यास विम्लधर्मी. सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान सामू असल्यास पिकांना योग्य अन्नद्रव्ये जमिनीत मिळतात