शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

स्वस्त धान्याचा अनियमित पुरवठा

By admin | Updated: June 2, 2014 01:05 IST

चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार अनियमित पुरवठा करीत असल्याची ग्राहकांची बोंब आहे...

नेरी : चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार अनियमित पुरवठा करीत असल्याची ग्राहकांची बोंब आहे. संबंधित विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात शासनाच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

स्वस्त धान्य पुरवठा दर महिन्याला वाटप व्हायला पाहिजे पण तसे होत नाही. त्यामुळे बरेच कुटुंबांना खासगी दुकानातून धान्य आणून वेळ निभवून घ्यावी लागतो. केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ तीन रु. प्रतिकिलो प्रमाणे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, हे धान्य अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रति व्यक्तीला पाच किलो धान्य देण्याची अंमलबजावणी केली. यात अंत्योदय, बीपीएल कार्डधारकाचा समावेश केला आहे. यापूर्वी एका राशन कार्ड वर ३५ किलो धान्य मिळत होते.

मात्र अन्न सुरक्षा योजना आल्यापासून अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो तर बीपीएल कार्ड धारकांना प्रत्येक पाच किलो धान्य देण्यात येते. यामुळे बर्‍याच कुटुंबांना या योजनेचा फटका बसला आहे. दोन तीन जणाचे कुटुंब असल्यास त्या कुटुंबाला फक्त १0 ते १५ किलो धान्य मिळत आहे. १0 ते १५ किलो धान्य महिनाभर पुरणार नाही. अशी गावात जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. एपीएल कार्डधारकांची तांदुळ, गहु, साखर पूर्णत: बंद झाल्याने कार्डधारकांचा त्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आहे.

ही योजना चालू झाल्यापासून अंत्योदय, बीपीएल व एपीएल कार्ड धारकाला सरकारी स्वस्त दुकानातून साखर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. यांचा नागरिकांना फटका बसत आहे. किराणा दुकानातून ३८ रु. किलोप्रमाणे साखर खरेदी करून आपल्या चहाची तलप भागवीत असताना दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे ३८ रुपये किलोची साखर घेणे अवघड होत आहे. त्यामुळे सरकारी स्वस्त धान्य दुकानात दर महिन्याला साखरीत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सरकारी स्वस्त धान्य दुकानात तांदुळ, गहु, साखर, तेल, दाल आदी गरजू वस्तु सरकारी स्वस्त दुकानात शासनाने देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या परिसरातील सरकारी स्वस्त धान्य दुकानात हे साहित्य दिले आहेत. पण लायसन्सधारक वाटप न करता संबंधित व्यक्तीला वाटप करावयाला लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)