शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

जय -पराजयाच्या गप्पांनी रंगू लागल्या गावचावडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सक्रिय असणारे विविध ...

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सक्रिय असणारे विविध राजकीय पक्षांचे स्थानिक समर्थक प्रभागातील नागरिकांना भेटी देत आहेत. आपल्या उमेदवाराकडे लक्ष द्या, असे सांगत आहेत तर पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील जय-पराजयाच्या आठवणी गावचावडी बसून जुने हिशेब चुकते करण्याचे आडाखे बांधू लागले आहेत. यामुळे गावचावडीवर दररोज सकाळ-संध्याकाळ गप्पांचा फड रंगू लागला आहे. तरुणाईकडून सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

जो उमेदवार गाव व प्रभागाच्या विकासाला न्याय देऊ शकतो, त्यांच्या पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत. . सर्वसामान्य जनतेला आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावात मिळणाऱ्या मताधिक्यावरच गावापुढेºयांचे वजन ठरते. मात्र सोशल मीडियाचा वाढत्या वापरामुळे मतदार हुशार झाले. गावातील मतदान कमी जास्त झाले तर तालुका व जिल्ह्यातील नेत्यांसमोर आपले वजन कमी होईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.

मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत गावखेड्यांत अनेक घडामोडी होणार आहेत. निवडणुका आल्यानंतर जि. प. पंचायत समितीच्या राजकारणातील सक्रिय पुढारी गावात जाऊन लुडबूड करतात. गावातील मताधिक्य गाव पुढाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत असल्याने ग्रामपंचायत व्होट बँक टिकविण्यासाठी तेही सक्रिय झाले आहेत.