शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:51 IST

जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, गोविंद सारडा, रामू तिवारी, अजय मस्के, मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या नावात आद्याक्षर 'च' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टांना पूर्ण करावाच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा. यासाठी २४ तासांचे योग्य नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो अथवा बाबुपेठमधला सामान्य विद्यार्थी असो, मेहनत करण्यासाठी २४ तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासांचा सद्पयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.चंद्रपूरमधून आॅलंम्पिकपटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाºया मिशन सेवा या दोन उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून आॅलंम्पिकसाठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि २४ तासांची योग्य आखणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे. भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की, 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे ' तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात ७२ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले.विविध विद्या शाखांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.आदिवासी युवकांच्या ‘मिशन शौर्य’ची आठवणयावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला. ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमानाएवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते. माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनही केले.