शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:51 IST

जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, गोविंद सारडा, रामू तिवारी, अजय मस्के, मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या नावात आद्याक्षर 'च' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टांना पूर्ण करावाच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा. यासाठी २४ तासांचे योग्य नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो अथवा बाबुपेठमधला सामान्य विद्यार्थी असो, मेहनत करण्यासाठी २४ तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासांचा सद्पयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.चंद्रपूरमधून आॅलंम्पिकपटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाºया मिशन सेवा या दोन उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून आॅलंम्पिकसाठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि २४ तासांची योग्य आखणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे. भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की, 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे ' तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात ७२ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले.विविध विद्या शाखांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.आदिवासी युवकांच्या ‘मिशन शौर्य’ची आठवणयावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला. ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमानाएवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते. माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनही केले.